लग्नानंतर मधुचंद्राला जाणं ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. मधुचंद्राला कुठे जायचं? यावर अनेकदा अनेक जोडपी लग्न ठरल्यापासूनच योजना आखून ठेवतात. मधुचंद्र आठवणीत कसा राहिल यासाठी दोघांचाही हा प्रयत्न असतो. मात्र मधुचंद्राहून परत आल्यावर कुणी घटस्फोट मागितला तर? होय अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. पतीने गोव्याला मधुचंद्रासाठी घेऊन जाण्याचं वचन दिलं होतं पण तो अयोध्येला घेऊन गेला हे कारण देत पत्नीने त्याच्याकडे घटस्फोट मागितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे पत्नीचंं म्हणणं?

“मधुचंद्रासाठी गोव्याला नेणार हे सांगून आपल्याला पती गोव्याला घेऊन गेला ही तक्रार करत मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. लग्नानंतर मधुचंद्राला गोव्याला घेऊन जाईन असं मला माझ्या पतीने सांगितलं होतं. मात्र तो अयोध्येला घेऊन गेला. इतकंच नाही तर पतीने त्याच्या आईलाही आमच्या बरोबर घेतलं.” असं या पत्नीने म्हटलं आहे. तसंच या घटनेनंतर चिडलेल्या महिलेने कोर्टात थेट घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधली ही घटना आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman seeks divorce husband promised honeymoon to goa took her to ayodhya scj