मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे . त्यानुसार दिनांक 1 जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेगुलेशन लागू करण्यात आलेले आहेत . यामध्ये एकूण ३३ मुख्य नियम आहेत . त्यापकी शेवटचा नियम क्रमांक ३३ खाली देण्यात येत आहेत.
३३) प्रत्येक वाहन चालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहित असणे आवश्यक आहे . कलम ११२, ११३, १२१,१२२,१२५,१३२,१३४,१८५, १८६,१९४,२०७..
सदर कलमे खालीलप्रमाणे आहेत कलम १९४ : विधीग्राह्य वजनापेक्षा जास्त वजन भरणे.
१) जर एखादी व्यक्ती वाहनामध्ये विधीग्राह्य क्षमतेपेक्षा जास्त माल भरत असेल तर अशा व्यक्तींला कमितकमी दोन हजार रुपये दंड आणि प्रत्येक जास्ती टनाला एक हजार रुपये दंड तसेच वाहनांतील जास्त माल कमी करण्यासाठी लागणारा खर्च भरावा लागतो.
२)एखाद्या क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेल्या वाहनाच्या चालकाने त्याला वाहन वजन काट्यावर नेण्याचे आदेश गणवेश परिधान केलेल्या अधिकार्याने दिले असतां जर तसे केले नाही तर त्याला पी तीन हजार पर्यंत दंड आहे.
कलम २०७ :नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना नसल्यामुळे वाहन अटकाऊन ठेवणे
जर वाहन विना नोंदणी किंवा लायसेन्स नसतांना किंवा योग्य प्रकारचे परमिट नसतांना सदर वाहन अटकाऊन ठेवण्याचे अधिकार पोलिस अधिकारी किंवा मोटार वाहन विभागाचे अधिकारी यांना आहे. – समाप्त
संजय डोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

important section of right to information act in indian constitution
संविधानभान : हम जानेंगे, हम जियेंगे!
cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली