श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्यात येतो आहे. त्यामुळेच यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या मूर्तीसाठी तब्बल ४० किलो सोन्याचे दागिने तयार करण्यात आले आहेत. मागील १५ वर्षांत देणगी स्वरुपात जमा झालेल्या सोन्यापासून हे दागिने तयार करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाच्या मूर्तीला घालण्यात येणारे दागिने मंगळवारी लक्ष्मी रोडवरील गाडगीळ ज्वेलर्समध्ये ठेवण्यात आले होते. हे दागिने पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

itendra Awhad
“महिला मुलं जन्माला घालणाऱ्या मशीन्स नाहीत”, ‘त्या’ चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा संताप
Dinesh Karthik
IPL 2024: दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनीच्या छायेत आणि संधीच्या प्रतीक्षेत राहूनही स्वत:चं स्थान निर्माण करणारा लढवय्या
Ruskin Bond
“परदेशी लोकांसारखा दिसतो म्हणून माझ्याकडून…”, प्रसिद्ध भारतीय लेखकाने व्यक्त केली खंत
Rashmika Mandanna on atal setu
रश्मिका मंदानानं अटल सेतूचं कौतुक करताच काँग्रेसची खोचक पोस्ट; ‘गुड जॉब’ म्हणत दिली सविस्तर आकडेवारी!
Prashant Damle Press conference in mumbai
प्रशांत दामलेंची घोषणा, “दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी मराठी कलाकार रस्त्यावर उतरणार, वेळ पडल्यास..”
MS Dhoni is God of Chennai Temples will be built for him- Ambati Rayudu
IPL 2024: “धोनीचे चेन्नईत मंदिर…”, CSK च्या माजी खेळाडूने माहीला म्हटलं देव; पाहा नेमकं म्हणाला तरी काय?
uddhav thackeray eknath shinde (3)
“एकनाथ शिंदेंकडून मतांसाठी पैसेवाटप, कोल्हापुरातल्या हॉटेलात तब्बल…”, ठाकरे गटाचा मोठा आरोप
Abhinay berde lakshmikant berde
“मागे लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा फोटो पाहिला अन्…”, अभिनय बेर्डेसाठी क्षितीज पटवर्धनची पोस्ट; म्हणाला, “बरीच मुलं वारसा घेतात, याने…”

गणेश मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले की, यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव असल्यामुळे हे नवीन दागिने घडविण्यात आले. यात हत्ती शिल्प, मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह ७ ते १० हजार खडयांची सजावट असलेला ९.५ किलोचा मुकुट, रत्नजडित खडयांनी तयार केलेला ७०० ग्रॅमचा शुंडहार, सूर्याच्या किरणांचा आभास निर्माण करणारे २ किलो वजनाचे कान आणि तब्बल ४ हजार सुवर्णटिकल्यांनी मिनाकाम करुन चंद्रकोरीचा आभास निर्मिती करणारा २.५ किलोचा अंगरखा बाप्पाला अर्पण करण्यात येणार आहे. पु. ना. गाडगीळ यांच्याकडील ४० कारागिरांनी या दागिन्यांसाठी ५ महिन्यांपासून मेहनत घेतली. या कारागिरांची मजुरी तब्बल सव्वा कोटी रूपये होती. मात्र कारागिरांनी मजुरी स्विकारली नसल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले