scorecardresearch

Asia Cup जिंकल्यानंतर मध्यरात्री मुंबईत पोहोचला रोहित शर्मा, सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी, पाहा VIDEO

Rohit Sharma Return to India Video: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रविवारी भारताने आशिया कप जिंकला. त्यानंतर लगेच रात्री टीम इंडिया मायदेशी परतला आहे.

India Return to Homeland
रोहित शर्मा मुंबईत पोहोचला (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rohit Sharma entering Mumbai at night after winning the Asia Cup: आशिया चषक २०२३ चा सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १० विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. ज्यामुळे टीम इंडियाने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, पाच वर्षांनंतर, भारताने अशी स्पर्धा जिंकली आहे, जिथे दोनपेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते. या विजयामुळे भारतीय चाहत्यांना बऱ्याच कालावधीनंतर आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे.

रोहित शर्मा रविवारी रात्री उशिरा मुंबईत पोहोचला. त्यानंतर तो कार चालवत घराजवळ पोहोचला, तेव्हा चाहत्यांना पाहून त्याला आश्चर्य वाटले. रोहितला पाहताच चाहत्यांनी आशिया कप जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. त्याच्यासोबत फोटो काढायचे असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहितने लगेचच चाहत्यांना होकार दिला आणि गाडीतून बाहेर आला.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

रोहितने चाहत्यांसोबत काढले फोटो –

रोहित टी-शर्ट आणि शॉट्समध्ये दिसत होता. त्याने सगळ्यांना वेळ देऊन फोटो काढले. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी रोहितसोबत फोटोही काढले. दरम्यान, यावेळी ते लोक कसे आले, असा सवाल भारतीय कर्णधाराने केला. एका कॅमेरामनने उत्तर दिले की, ते फक्त तुमच्यासाठीच आलो आहे.

हेही वाचा – Team India: इशान आणि विराटला एकमेकांची नक्कल करताना पाहून इतर खेळाडूंना आवरले नाही हसू, VIDEO होतोय व्हायरल

रोहितला नेहमीच आठवेल आशिया कपचा विजय –

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या संघाच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. त्याने असे प्रयत्न दीर्घकाळ स्मरणात राहतील असे सांगितले. मोहम्मद सिराजने सात षटकांत २१ धावा देत सहा विकेट्स घेतल्या, ज्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा डाव ५० धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात हे लक्ष्य एकही गडी न गमावता ६.१ षटकांत पूर्ण केले. सामन्यानंतर रोहित म्हणाला, “ही चांगली कामगिरी होती. अंतिम फेरीत असे खेळणे खूप छान होते. यावरून संघाची मानसिकता दिसून येते. अशी कामगिरी दीर्घकाळ स्मरणात राहील.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 11:19 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×