अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आसारामबापू यांना अनावृत पत्र पाठवून मंत्रांच्या साहाय्याने पाऊस पाडण्याचे आव्हान देण्यात आले आहे. मंत्रशक्तीने पाऊस पाडण्याचा आणि हवेची दिशा बदलण्याचा दावा आसारामबापूंनी गुरुवारी दूरचित्रवाहिन्यांवर केला होता. समितीने कोणताही चमत्कार सिद्ध करणाऱ्याला १५ लाख रुपये देण्याचे कबूल केले आहे, मात्र समितीच्या १५ लाख रुपयांची फारशी गरज आसारामबापू यांना नसून त्यांनी केवळ शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत. मंत्रांनी पाऊस पडणार असेल तर सरकार त्यांच्या उपक्रमाला सर्वतोपरी मदत करायला सहज तयार होईल. मंत्रांच्या सामर्थ्यांमुळे लोकांना पुरापासूनही वाचवता येईल. ज्या शक्तीचा आसारामबापू दावा करीत आहेत ती शक्ती भूकंपापासूनही संरक्षण करू शकेल. त्सुनामी आणि सागरी तुफानांच्या वेळी त्यांनी अशी सूचना दिली असती तर पुढील हानी टाळता येऊ शकली असती. या सर्व आपत्तीच्या वेळी आसारामबापू संकटमोचन असल्याचे सिद्ध झाले असते, असे उपरोधिक पत्र समितीकडून आसारामबापू यांना पाठवण्यात आले आहे.

Mumbai Municipal Corporation, bmc Imposes Fines on Contractors, Fines on Contractors for Negligence in Drain Cleaning, bmc Fines on Contractors, Negligence in Drain Cleaning in Mumbai, Drainage Cleaning, marathi news, drainage cleaning news,
मुंबई : नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई
supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन