Mumbai Maharashtra News Update : महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर सांगली आणि मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. विश्वाजीत कदम यांनी सांगलीच्या जागेचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे, तर मुंबईतील जागावाटपावरून वर्षा गायकडवाड यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
याशिवाय काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेड येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावरूनही आज राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…
Maharashtra Breaking News Updates 12 April 2024 : महायुतीत दोन जागांचा तिढा अद्याप कायम; रत्नागिरी-सिंधुदुर्ग, साताऱ्यासह ११ मतदारसंघांत आजपासून निवडणूक प्रक्रिया
याचिकाकर्त्या तीन पीडितांवर ४ ऑक्टोबर २०१० रोजी प्राणघातक हल्ला झाला होता.
साडेतीन किलो सोने जप्त करण्यात आले असून सोन्याची किंमत दोन कोटी रुपये आहे.
उरण : उलवे नोडच्या किनाऱ्यावर सिडकोने तिरुपती व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासाठी दिलेल्या भूखंडाच्या सीआरझेड मंजुरीला आव्हान देणारी याचिका पर्यावरणवाद्यांकडून हरित न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर २५ एप्रिलला सुनावणी करण्यात येणार आहे. त्या वेळी याचिका स्वीकारणार की नाही ते स्पष्ट होणार आहे. मात्र…
सीमावर्ती भागात अन्य राष्ट्र भारताच्या सैनिकांची हत्या करत असताना आता ५६ इंचाची छाती कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला.
नागपूर लोकसभा भाजपने सलग दोनदा चांगल्या मताधिक्याने जिंकली. त्यामुळे नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जाऊ लागला आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या विद्युत विभागाकडून कोणतीही परवानगी नसताना फ्लेमिंगो तसेच स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास तसेच नेरुळ येथील टी एस चाणक्य तलाव परिसरातील कांदळवन तसेच पाणथळ क्षेत्रात सौर दिव्यांचे खांब बसवण्याचा प्रताप नवी मुंबई महापालिकेच्या अंगलट आला आहे. याबाबत पर्यावणप्रेमींकडून महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे अखेर गुरुवारी सायंकाळपासून सौर दिव्यांचे खांब काढण्यास सुरुवात झाली आहे.
राजकीय भूकंपानंतर गटातटात विभागलेले प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या सोयीनुसार महायुती व ‘मविआ’ या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये एकत्रित आलेत.
कोल्हापूरच्या न्यू कॉजेलमध्ये शाहू महाराजांचा प्रचार होत असल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून प्राचार्यांना जाब विचारण्यासाठी ते महाविद्यालयात दाखल झाले आहेत.
विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख संगणक अभियंता तरुणीला महागात पडली.
विशेष म्हणजे यात सहभाग घेऊन विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या तीन मतदारांना अनुक्रमे मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल मिळणार आहे.
नाशिक – लेव्ही वसुलीच्या वादातून सलग आठ दिवस ठप्प असणारे कांदा लिलाव लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी सकाळपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात १६ हजार क्विंटलची आवक होऊन त्यास सरासरी दीड हजार रुपये भाव मिळाला.
घरपोच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र. येथे वाघ हमखास दर्शन देतात असाच पर्यटकांचा अनुभव!
मुंबई : म्हाडा गोरेगावमधील पहाडी परिसरातील गृहप्रकल्पात प्रथमच ३९ मजली निवासी इमारत बांधत आहे. या गृहप्रकल्पात व्यायामशाळा, जलतरण तलाव, विजेवरील वाहनांसाठी चार्जिंग स्थानक, मैदान आदी पंचतारांकीत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे ६० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून ३९ मजली इमारतीमधील उच्च आणि मध्यम गटातील ३३२ घरांसाठी २०२५ ऐवजी २०२४ मध्येच सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे.
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासन रेल्वे स्थानकांत महिलांसाठी उच्च दर्जाची स्वच्छतागृहे उपलब्ध करीत असतानाच, दुसरीकडे सीएसएमटी स्थानकातील स्वच्छतागृहे बंद केली जात आहेत. महिलांसाठी दूरवर गर्दीच्या ठिकाणी पर्यायी स्वच्छतागृह उपलब्ध करण्यात आले असून महिलांना तिथवर जाऊन स्वच्छतागृहांच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची प्रचंड कुचंबणा होत आहे.
पुण्यातील सुमारे शंभरहून अधिक खासगी रुग्णालये विनापरवाना सुरू असल्याची बाब समोर आली होती.
महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर सांगली आणि मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
काँग्रेसची "अन्याय यात्रा" !
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 12, 2024
सांगली देता का सांगली..?
धुळ्यात ही नाराजीची ठिणगी पडली
उत्तर मुंबई का गळ्यात मारली?
मुंबईत काँग्रेस "न्याया"साठी मातोश्री समोर येऊन थांबली..!
काँग्रेसची अवस्था पाहून "न्यायपत्र" आतल्या आत रडलं
स्वतःच स्वतःची पाने फाडत चालू लागलं
मला न्याय देता का…
वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये रायगड, उस्मानाबाद, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its fifth list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 11, 2024
The VBA State Committee has decided to nominate Shri Abul Hasan Khan from Mumbai South Central. Previously, he was nominated from Mumbai North Central.… pic.twitter.com/RSPaOCRgAD
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू असताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआचे उमेदवार छत्रपती शाहू यांच्या वारसाहक्का मुद्दा उकरून काढला. त्यामुळे सुरुवातीला विकासावर ही निवडणूक लढवली जाईल, असे सांगणारे आता कोल्हापूरच्या गादीवर बोलू लागले आहेत. यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शाहू यांना इशारा देत असताना निवडणूक न लढविण्याची सूचना केली आहे.
छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल यांनी दावा केला होता की, शरद पवार एनडीएत सहभागी होण्यासाठी तयार होते. या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, यांचे सर्वांचे (अजित पवार गट) प्रयत्न होते की शरद पवारांना एनडीएत घेऊन जायचे. शरद पवार जर तयार असते, तर एनडीएत गेलेच असते. पण ते कधीच तयार नव्हते. शरद पवार यांनी भाजपाची विचारसरणी स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे आमचा पक्ष फुटला. मात्र पक्ष फुटला तरी शरद पवार यांनी विचारधारा न सोडण्याचा निर्णय घेतला.
मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. अमोल किर्तीकर यांच्यावर करोना काळात खिचडी वाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अमोल किर्तीकर यांचे वडील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेलेले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत गजानन किर्तीकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करू, असे दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र काल (दि. १३ एप्रिल) गोरेगावमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी मुलगा अमोल किर्तीकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला. तसेच पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधले.
संघाचे अस्तित्व ठेवायचे व टिकवायचे असेल तर मोदी यांना २०२४ च्या निवडणुकीत पाडा असा सल्लाही ॲड. आंबेडकर यांनी संघाच्या स्वयंसेवकांना दिला.
नगरपरिषदेच्या इमारतीवरील फलक मराठीतच राहील, अशा आशयाचा ठराव मंगळूरपीर नगरपरिषदेने पारित केला होता.
मुंबई : बारामती, रायगड, कोल्हापूरसह ११ मतदारसंघांमधील मतदानाची अधिसूचना आज, शुक्रवारी जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज आज, शुक्रवारपासून दाखल करण्यात येणार असले तरी महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप की शिंदे गट लढवणार याचा निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर साताऱ्यातही भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.