मुंबई : चर्नी रोड येथील सावित्रीबाई फुले महिला छात्रालयात विद्यार्थिनीची हत्या झाल्याने वसतिगृहांतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तरुणीची हत्या करून आत्महत्या केलेला सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजियाची नेमणूक नियमानुसार झालेली नव्हती. शासनाने काटकसरीचे धोरण म्हणून सुरक्षा रक्षकांची पदे कमी केल्यामुळे कनोजिया याला सुरक्षा रक्षकाचे काम देण्यात आले होते, अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी कनोजिया हा गेल्या अनेक वर्षांपासून वसतिगृहात कपडय़ांना इस्त्री करण्यासह इतर छोटी-मोठी कामे करत होता.  साधारणत: दीड वर्षांपूर्वी त्याची सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. कोणत्या प्रक्रियेंतर्गत त्याची नियुक्ती करण्यात आली, याबाबत पोलीस तपास करत आहेत. सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीचे काम निविदा प्रक्रिया राबवून खासगी कंपनीद्वारे करण्यात येते. मात्र, कनोजियाची नियुक्ती अशा स्वरुपाची कोणतीही प्रक्रिया पूर्ण करून झालेली नव्हती, असे समजते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hostel security issues in discussion after college girl murder in mumbai hostel mumbai print news zws
First published on: 08-06-2023 at 05:13 IST