कोकण किनारपट्टीवर राहणा-या माणसासाठी शहाळं आणि काजू ही घरातलीच उत्पादनं…त्यांचा वापर करून केलेली ही भाजी भल्यभल्यांना भुरळ घालते. चला तर मग पाहुयात शहाळं- काजू मालवणी ग्रेव्ही कशी करायची.. शहाळं- काजू मालवणी ग्रेव्ही साहित्य २ वाटी शहाळ्याचं खोबरं पातळ स्लाईस करून१/२ वाटी तुकडा काजू२ चमचे ओलं खोबरं५ लवंगा, ५ काळी मिरी, १ ईंच दालचिनीचा तुकडा,१ हिरवी वेलची१ चमचा धने, १/२ चमचा बडीशोप१ चमचा लाल तिखट१/४ चमचा हळद१ चमचा चिंचेचा कोळ१ चमचा गुळ२ पळी तेलमीठ आवश्यकतेनुसार१ कांदा उभी स्लाईस करून२ कांदे बारीक चिरून फोडणीकरिता५-६ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या शहाळं- काजू मालवणी ग्रेव्ही कृती १. प्रथम शहाळ्याच्या खोबऱ्याच्या स्लाईस करून घ्याव्यात आणि काजू पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवावे. २. उभा कापलेला कांदा, पाच सहा लसणाच्या पाकळ्या, थोडे काजू आणि सर्व खडा मसाला थोड्याशा तेलात परतून नंतर खोबरे सुद्धा त्याबरोबरच तांबूस रंगावर परतून घ्यावे आणि मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. ३. एका भांड्यात फोडणी करता तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. नंतर हळद, मिरची घालून भिजवलेले काजू आणि शहाळ्याचे खोबरं आणि थोडसं पाणी आणि मीठ घालून पाच मिनिटं मंद आचेवर झाकून ठेवावे. हेही वाचा >> गावरान खर्डा मांदेली; अलिबाग स्पेशल रेसिपी एकदा खाल तर खातच रहाल, लगेच नोट करा ४. त्यानंतर मिक्सर मधून वाटून घेतलेले वाटण त्यात घालून गुळ आणि चिंचेचा कोळ घालून छान उकळ काढून घ्यावी. कोथिंबीर आणि शहाळ्याच्या स्लाईसने सजवून सर्व्ह करावी.(पाच सहा तास मुरल्यानंतर ही आमटी वाढावी, ती जास्त चविष्ट लागते.) कोथिंबीर घालून भाजी सजवावी व गरम गरम खायला द्यावी.