स्थानिक स्वराज्य संस्था : सरावासाठी प्रश्न.
= खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?
अ) कर चुकवणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असू नये अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली.
ब) त्रिस्तरीय पंचायत राजऐवजी द्विस्तरीय पंचायत राज असावी अशी शिफारस एल. एम. सिंघवी समितीने केली होती.
१) फक्त अ २) फक्त इ
३) अ व इ दोन्ही ४) अ व इ दोन्हीही नाही
= खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?
अ) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण १४ सदस्य आहेत.
ब) पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांच्या निवडणुकीसंदर्भात काही विवाद निर्माण झाले असतील आणि त्यासंबंधी विभागीय आयुक्तांनी काही निर्णय दिला असेल तर त्या निर्णयावर राज्य सरकारकडे अपिल करता येते. हे अपिल विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयानंतर ३० दिवसांच्या मुदतीत करणे आवश्यक असते.
१) फक्त अ २) फक्त ब ३) अ व ब दोन्ही. ४) अ व ब दोन्हीही नाही.
= खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?
अ) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१च्या ५६व्या कलमात प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असेल, अशी तरतूद करण्यात
आलेली आहे.
ब) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कलम ४३ (१) नुसार जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची मुदत अडीच वष्रे करण्यात आली आहे.
१) फक्त अ २) फक्त ब
३) अ व ब दोन्ही ४) अ व ब दोन्हीही नाही
= खालीलपकी कोणते विधान चूक आहे?
अ) उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात.
ब) पंचायत समिती सभापती तसेच उपसभापती यांच्या विरूद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असेल व तो फेटाळला गेला असेल तर पुन्हा नव्याने अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी किमान एक वर्षांचा कालावधी उलटणे आवश्यक असते.
क) सरपंच किंवा उपसरपंच यांच्या वरील अविश्वास ठरावावर विचार करण्यासाठी खास सभा बोलावण्याचे अधिकार पंचायत समिती सभापतींना आहेत. या सभेचे अध्यक्षस्थान पंचायत समितीचे अध्यक्ष भूषवतात.
ड) जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची पदे एकाच वेळी रिक्त झाली असतील किंवा हे दोन्हीही एकाच वेळी रजेवर असतील तेव्हा अध्यक्षांची निवड करण्यासाठी विषय समितीमधील सभापतींपकी एकाची निवड या स्थानी चिठ्ठय़ा टाकून केली जाते.
१) अ २) ब ३) क ४) ड
भारतीय राज्यघटना : सरावासाठी प्रश्न.
= खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?
अ) भारतीय घटनेत संघराज्य तसेच एकात्मक राज्य अशी दोन्ही वैशिष्टय़े अवतरलेली आहेत.
ब) मूलभूत हक्क संरक्षणाची हमी देणारे व मूलभूत हक्कांवर गदा आली असता न्यायालयासमोर दाद मागण्याचा हक्क देणारे भारतीय घटनेतील ३२ वे कलम म्हणजे मूलभूत हक्कांचा आत्मा होय.
क) न्यायालयीन पुनर्विलोकनाची कल्पना आपण अमेरिकन घटनेवरून घेतलेली आहे.
ड) पंतप्रधान हा केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो.
१) अ आणि ब २) ब आणि ड
३) क आणि अ ४) वरील सर्व.
= खालीलपकी कोणते विधान चूक आहे?
अ) राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडी संदर्भात वाद निर्माण झाल्यास त्यांवर निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा आहे हे भारतीय राज्यघटनेच्या ७१ व्या कलमात नमूद केलेले आहे.
ब) केंद्र सरकारच्या कारभाराविषयी माहिती व केंद्रीय मंत्रिमंडळाचे निर्णय पंतप्रधान राष्ट्रपतींना कळवितात. राष्ट्रपतींच्या संदर्भातील पंतप्रधानांची ही कर्तव्य घटनेच्या ७८ व्या कलमात नमूद केलेली आहेत.
क) लोकसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.
ड) पंतप्रधान हा राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असतो.
१) अ २) ब  ३) क  ४) ड

आरटीई कायद्यातील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती, एक किमी परिघातील खासगी शाळांना सूट देण्यावर बोट
Senior Government Officer Displayed Board Outside His Office
“मी माझ्या पगारावर समाधानी” म्हणजे काय समजायचं? गट विकास अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेरील पाटी व्हायरल
shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
SBI refuses to disclose electoral bonds details
माहितीच्या अधिकारांतर्गत निवडणूक रोख्यांचा तपशील देण्यास SBI चा नकार, कारण काय?