दहावी-बारावीच्या परीक्षा संपून आता साधारणपणे महिना उलटला आहे. ही परीक्षा दिलेल्या समस्त विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकोंना हळूहळू वेध लागतील ते निकोलाचे आणि त्यानंतर दर्जेदार संस्थेत प्रवेश मिळवण्याचे! निकाल काय लागेल, मनाजोगे मार्क्‍स मिळतील का, प्रवेशाचा कट-ऑफ काय असेल, ठरवल्यानुसार उत्तम संस्थेत प्रवेश मिळेल को, याची एक अनामिक हूरहूर प्रत्येक विद्यार्थी-पालकांना या सुट्टीत लागलेली असते आणि ते स्वाभाविकच आहे म्हणा!