देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे. सर्व पक्षांनी आणि नेत्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिलं आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने ‘अब की बार ४०० पार’ चा नारा दिला आहे. १८ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच त्यांनी दिल्लीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन “अब की बार ४०० पार” चा नारा दिला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपाने हा नारा देणं सोडून दिलं आहे. तर, इंडिया आघाडीने अनेक मतदारसंघांमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे.

दरम्यान, तिसऱ्यांदा सत्तास्थापन करण्यासाठी मोदी आणि भाजपाने नेमकी कोणती रणनिती आखली आहे. भाजपा या निवडणुकीत कशी कामगिरी करेल? याबाबत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी विश्लेषण केलं आहे.

Election Commission of India
Haryana Assembly Election: मोठी बातमी! हरियाणा विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निकाल; कोणाला होणार लाभ?
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला, “काही लोकांना रोज माझा राजीनामा मागितल्याशिवाय..”
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
BJP Leader Said This Thing About Ajit Pawar
Mahayuti : महायुतीत ठिणगी? “अजित पवारांबरोबरची युती म्हणजे असंगाशी संग, त्यांनाही..”, भाजपा नेत्याचं वक्तव्य
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackeray?
Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंची मला खरंच दया येते, त्यांना लाचारासारखं…”; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
jharkhand assembly elections BJP game plan
Jharkhand: भाजपाचा झारखंडसाठी गेम प्लॅन तयार; हेमंत सोरेन यांना आगामी निवडणुकीत धक्का बसणार?
What CM Eknath Shinde Said About Chhatrpati Shivaji Maharaj ?
Eknath Shinde : “छत्रपती शिवरायांची १०० वेळा माफी मागायला तयार, पण…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य चर्चेत
Vijay Wadettivar Allegation On Eknath Shinde Govt
Vijay Wadettiwar : “शिंदे गटातल्या आमदारांची मस्ती, पोलिसांना घरगडी म्हणून वागवत आहेत, अपमान…”, व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवार यांचा आरोप
What Manoj Jarange Said About Devendra Fadnavis?
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी वाढवलं महायुतीचं टेन्शन! भाजपाला इशारा देत म्हणाले, “नागपूर..”

हे ही वाचा >> “मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो, मला अनेक मुस्लीम मित्र, पण २००२ नंतर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत

गिरिश कुबेर म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक ही भाजपासाठी पहिली अशी निवडणूक आहे ज्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधकांना उत्तरं देण्याची वेळ आली आहे. माढा, माळशिरस, सोलापूर या भागात नरेंद्र मोदींना २४ तासांच्या आत दुसरी सभा घ्यावी लागली आहे. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. तसेच नरेंद्र मोदी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या एक वर्ष आधीपासूनच दर महिन्याला किमान एकदा तरी महाराष्ट्राला भेट दिली आहे. मोदींचा जर महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांवर विश्वास असता तर त्यांनी महाराष्ट्राला इतक्या भेटी दिल्या असत्या का? असा प्रश्न पडतो. तसेच या निवडणुकीच्या पाच टप्प्यांमध्ये प्रचार करत असताना नरेंद्र मोदींना प्रत्येक वेळी नवनवे मुद्दे काढून भाषणं करावी लागली आहेत. यासह मोदींनी या निवडणुकीत आधीच्या दोन निवडणुकांपेक्षा थोडी वेगळी रणनिती आखलेली दिसत आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून ते आतापर्यंत त्यांनी १७ ते १८ वेळा महाराष्ट्राचा दौरा केला आहे.