प्रत्येक व्यक्ती विचारांचं प्रतिरूप असते;आणि विचार..भावनांचं शब्दरूप असतात.व्यक्तित्वाच्या अभिव्यक्तीचंसंवाद माध्यम म्हणजे विचारमनस्वी सर्जनशीलतेचं वैश्विक सामथ्र्य म्हणजे विचार.विचारांतून कृतीकृतीतून सवयसवयीतून वर्तनवर्तनातून स्वभावस्वभावातून व्यक्तित्व व्यक्तित्वातून चारित्र्यचारित्र्यातून आयुष्य..अशी ‘जडणघडण’ होत असते.थोर तत्त्वज्ञ इमर्सन म्हणतात:‘विचारच दळिद्री असले की,आयुष्य कंगाल बनतं,’ म्हणूनचअविचारी दिशाहीन माणसं परिस्थितीची गुलाम असतात.प्रतिकूल, नकारात्मक घडतानाविचारांनी स्थिर आणि शांत राहाणंजगण्याची पहिली कसोटी असते.संकटकाळातही सातत्यानंसकारात्मक विचार करणं हीयशाची खरी परीक्षा असते.यशाचं गमक विचार करण्याच्यापद्धतीत सामावलेलं आहे.आपले विचारच आयुष्य कसं जगायचं हे ठरवीत असतात आणिविचारांमुळेच जगण्याला भान येतं.फ्रेंच तत्त्वज्ञ देकार्त म्हणतात:'I Think; therefore I am.'vijayjamsandekar@yahoo.com