तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपल्या गावातील २००० कुटुंबांना प्रत्येकी १०-१० लाख रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या मार्फेत ही रक्कम या कुटुंबांना दिली जाईल असं चंद्रशेखर राव यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ही घोषणा फक्त मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या गावापुरती करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे मूळचे चिंतामडाका गावातील आहेत. आपण गावातील लोकांचे ऋणी असून, त्यांचे आभारी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर राव यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "राज्य सरकार चिंतामडका गावात राहणाऱ्या २००० कुटुंबांना १० लाख रुपये देणार आहे". पुढे ते म्हणालेत की, "माझा जन्म सिद्दीपेठ जिल्ह्यातील या गावात झाला आहे. मी चिंतामडाका गावातील लोकांचा ऋणी आहे. मी तात्काळ ही रक्कम मंजूर करणार आहे". Telangana CM K Chandrashekar Rao announces that the state govt will give Rs.10 lakhs to all 2000 families living in village Chintamadaka; says,"I was born in this village of Siddipet District & I owe to the public of Chintamadaka village. I will sanction the amount immediately." pic.twitter.com/t7Ioy5gmDB — ANI (@ANI) July 22, 2019 दरम्यान चंद्रशेखर राव यांच्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर २०० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. चंद्रशेखर राव यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून ट्रोल केलं आहे. जर तुम्हाला आपल्या गावातील लोकांचे उपकार फेडायचे असतील तर आपले पैसे खर्च का करत नाही ? असा प्रश्न एकाने विचारला आहे. Why @KTRTRS @TelanganaCMO thinks that he is king and all money belongs to him? The money he is spending is not his own, but public gave it to state government for better administration. Test of people of Telangana how long they tolerate him. — PK Isn't he CM for whole state? If it's personal connection then shouldn't money come from his own pocket? — Animesh (@SinghAnimeshK) July 22, 2019 Yes KCR indirectly keep giving money to your people for votes .. This will cost 200 Crores to the tax payers Rythu Bandhu .. Where all the farmers got 8,000 per acre ... No rules nothing .. This costed Govt 12000 Crores for tax payers . — Srikanth (@srikanthbjp_) July 22, 2019 But it's Taxpayers money pic.twitter.com/Y2pc8ESrEm — Nams12 (@Nams125) July 22, 2019 चंद्रशेखर राव यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या गावातील लोकांचा फायदा होणार असला तरी लोकांनी हा आमचा पैसा असल्याने वैयक्तिक कारणासाठी खर्च केला जाऊ नये असं मत व्यक्त केलं आहे. हा करदात्यांचा पैसा असून तो अशा पद्दतीने खर्च करण्याचा त्यांना अधिकार नाही असंही अनेकांनी म्हटलं आहे.