नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून काही लष्कर मागे घेण्याचा आणि कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांवर सोपवण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले. तसेच काश्मीरच्या काही भागांतून सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) मागे घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

 जम्मू-काश्मीर येथील ‘गुलिस्तान न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत शहा म्हणाले की सैन्य मागे घेण्याची तसेच कायदा व सुव्यवस्था एकटया जम्मू आणि काश्मीर पोलिसांवर सोपवण्याची केंद्राची योजना आहे. दहशतवाद्यांशी होणाऱ्या चकमकीत पोलीसही आघाडीवर असतात. त्यामुळे तेथील पोलीस दलाला आम्ही बळकट करत आहोत.  जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर टप्प्या-टप्प्याने बराकीकडे परतेल, अशी रचना तयार केली आहे. पुढील सात वर्षांची योजना तयार आहे. दरम्यान, आमच्यात युती झाली तेव्हा अफ्स्पा हा जुलुमी कायदा मागे घेण्याच्या मुद्दयाशी भाजपही  पूर्णपणे सहमत होता, अशी प्रतिक्रिया पीडीपीच्या प्रमुख   महेबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली.

Devendra fadnavis latest marathi news
‘झोपु’ योजनांमुळे केंद्र सरकारची शेकडो एकर जमीन लवकरच खुली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा; नव्या गृहनिर्माण धोरणाचे संकेत
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Kolkata Nabanna March Updates Today| Nabanna March Kolkata Doctor Sexual Abuse and Murder Case
Nabanna March Kolkata : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधातील आंदोलन चिघळले, पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर!
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Confession of Union Finance Minister Nirmala Sitharaman regarding Tax in India
कर शून्यावर आणण्याची माझी इच्छा; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कबुली
Jammu and Kashmir vidhan sabha elections marathi news
जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक कशी घेणार?
Another mistake in Devendra Fadnavis security
देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत पुन्हा चूक; नेमकं काय घडलं?
himanta Biswa Sarma
Assam : ‘खतं जिहाद’ अन् ‘जमीन जिहाद’नंतर आता आसामध्ये ‘पूर जिहाद’ होत असल्याचा आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप, नेमकं काय म्हणाले?