नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरील पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन बुधवारी आणखी चिघळले. खनौरी येथे झालेल्या हिंसाचारात एका तरुण आंदोलकाचा मृत्यू झाला तर १२ पोलीस जखमी झाले आहेत. सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंसाचार उफाळला. आंदोलकांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला, तर आंदोलकांनी मिरचीची पूड जाळल्यामुळे अनेक पोलिसांना त्रास झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा