गुजरात हायकोर्टाने नडियाद जिल्ह्यात झालेल्या ३० गायींच्या कत्तलीला बीभत्स म्हणत यासाठी देवही आपल्याला माफ करणार नाही असं म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाने हेदेखील म्हटलं आहे की लोकांच्या सोयीसाठी निर्दोष पशूंचा बळी दिला जाऊ शकत नाही. अशा कृत्यासाठी देवही माफ करणार नाही. नडियादमध्ये कत्तल केलेल्या गायींचे सांगाडे उघड्यावर दिसून आले. त्याचे फोटोही समोर आले ज्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने हे टिपण्णी केली आहे. भटक्या जनावरांच्या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी राज्य सरकारने पांजरपोळात गायी ठेवल्या होत्या. त्यातल्या ३० गायींचा मृत्यू झाला. ज्यानंतर आता या प्रकरणी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

न्यायमूर्ती आशुतोष शास्त्री आणि न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक यांच्या पीठाने म्हटलं आहे नडियाद नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या भागांमध्ये गायींच्या सांगाड्यांचे जे फोटो समोर आले आहेत ते अस्वस्थ करणारे आहेत. या प्रकरणात नडियादचे रहिवासी मौलिक श्रीमिली यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

Two sent to Yerawada jail in Kalyaninagar accident case Pune news
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
is offices safe for woman to work
तुमचं कार्यालयीन ठिकाण सुरक्षित आहे का?
The woman attacked for refusing to marry in thane
विवाह करण्यास नकार दिल्याने महिलेने केला गुप्तांगावर हल्ला; तरुण गंभीर जखमी
Nanded Crime News
ऑनलाईन जुगारामुळे कर्ज झाल्याने वृद्धेची हत्या करुन दागिन्यांची चोरी
Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “पोलीस आमच्यापेक्षाही वेगाने पळून गेले”, कोलकात्यातील रुग्णालयात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी परिचारिकांची संतप्त प्रतिक्रिया!
An inmate attacked another inmate in Aadharwadi Jail in Kalyan
कल्याणमधील आधारवाडी तुरूंगात एका कैद्याचा दुसऱ्या कैद्यावर हल्ला
Ghatkopar, hoarding, Bhavesh Bhinde,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेची अटक कायदेशीरच, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

श्रीमाली यांनी त्यांच्या याचिकेत असं म्हटलं आहे की पांजरपोळातल्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. तसंच एका खुल्या जागेवर कत्तल केलेल्या गायींचे सांगाडे फेकण्यात आले होते. यावर जस्टिस शास्त्री असं म्हणाले की हे प्रकरण खूपच अस्वस्थ करणारं आहे. लोकांच्या सोयीसाठी मुक्या प्राण्यांचा बळी दिला जाऊ शकत नाही. या कृतीसाठी आपल्याला देवही माफ करणार नाही. लोकांच्या सोयीसाठी आपण निष्पाप प्राण्यांचा बळी देऊ शकत नाही. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.