दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. नशेमध्ये अडकलेल्या लोकांचं जीवन वाचवणे, जागरूकता करणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात या दिवसाचं महत्त्व, इतिहास आणि या वर्षीच्या थीमबद्दल.

इतिहास काय सांगतो?

डिसेंबर १९८७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केला. हा दिवस अंमली पदार्थांचे सेवन एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आयोग्यावर कसे दुष्परिणाम करते, यामुळे एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे बिघडू शकते याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

Ambedkarist activists active in support of Mavia Discuss the danger of changing the constitution
‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन

या दिवसाचे महत्व काय?

हा दिवस पाळण्यामागे जगभरातील खासकरून लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण व्हावी हा उद्देश असतो. जगभरातील शाळा, महाविद्यालये, कामाची ठिकाणे आणि सार्वजनिक ठिकाणी या विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच ड्रग्ज आणि त्याच्या सेवनाच्या जोखमीविषयी माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.

२०२१ या वर्षाची थीम काय?

‘जीवन वाचवण्यासाठी अंमली पदार्थांशी संबंधित माहिती शेअर करा’ अशी यंदाची थीम आहे. या थीमसह अनेक पोस्टर, चित्रे सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत. कोविड -१९ मुळे आपल्याला मोठी शिकवण मिळाली आहे की आपण एकत्रपणे कोणत्याही समस्येला किंवा आपत्तीला सामोरे जाऊ शकतो. म्हणूनच हा दिवस म्हणजे जगभरातील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, सामाजिक आणि इतर संघटना व सरकार यांनी एकत्र येऊन ड्रग्जच्या आधीन गेलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी ऐक्य दाखवण्याची संधी आहे. तज्ञांचे मत आहे की या आव्हानाला तोंड देण्यासाठी सगळयांनी एकत्र येऊन मदत करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे.