भारतीय सैन्य दलात भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निवीर ही योजना लागू केली आहे. मात्र या योजनेला देशभरात अनेक ठिकाणांहून विरोध झाला. विरोधी पक्ष आणि देशातले बहुसंख्य युवक अजूनही या योजनेचा विरोध करत आहेत. काँग्रेसचा देखील या योजनेला पहिल्यापासून विरोध आहे. दरम्यान, आता काँग्रेसने या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभर काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करत आहेत. आज त्यांनी महाराष्ट्रातल्या भंडाऱ्यात प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी घोषणा केली की, देशात काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना बंद करू.

राहुल गांधी म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी बेरजोगारीचा मुद्दा मांडायचे आणि म्हणायचे देशातील २ कोटी तरुणांना रोजगार देणार. परंतु त्यांनी काहीच केलं नाही. उलट त्यांनी नोटबंदी केली, चुकीचा जीएसटी लागू केला. अग्निवीर योजना आणली, या सगळ्यामुळे देशात होते तेवढे रोजगारही बंद झाले. त्यामुळे दोन गोष्टी मी आधीच स्पष्ट करतो. यांची जी अग्निवीर योजना आहे ती आम्ही आमचं सरकार येताच बंद करू. कारण आम्हाला एकाच देशात दोन प्रकारचे शहीद नकोत. एक शहीद, ज्याला सरकार पेन्शन देणार, शहिदाचा दर्जा देणार, त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करणा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या दुसऱ्या जवानाला मात्र शहिदाचा दर्जादेखील दिला जाणार नाही, त्या जवानाच्या कुटुंबाला भरपाई मिळणार नाही, पेन्शन मिळणार नाही. हा भेदभाव आहे.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
Loksatta karan rajkaran Deputy Chief Minister Ajit Pawar refused to answer whether he would reunite with Sharad Pawar group
शरद पवारांशी हातमिळवणी बाबत अजित पवारांचे मौन
Narendra Modi
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं कोलकात्यातील बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान; लाल किल्ल्यावरून भाषणात म्हणाले, “काही चिंताजनक गोष्टी…”

राहुल गांधी म्हणाले, दोन तरुण देशासाठी बलिदान देतात, मग त्या दोघांच्या कुटुंबियांना सरकारने सारखीच वागणूक द्यायला हवी. त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना बंद करणार. खरंतर ती योजना भारतीय सैन्याला नको होती. त्यांनी अशी योजना मागितलीच नव्हती. ही योजना पंतप्रधान कार्यालयाने बनवली आहे. त्यांनी ही योजना लागू केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने सैन्याला सांगितलं तुम्ही अग्निवीर योजना लागू करा. देशातल्या कोणत्याही तरुणाला ही योजना नको आहे. पूर्वी देशात सैन्यभरती केंद्र होते, जे आता बंद पडलेत. कारण सर्वांना माहिती आहे की अग्निवीर झाल्यास पेन्शन किंवा इतर कुठल्याही सरकारी योजना मिळणार नाहीत. बलिदानानंतर शहिदाचा दर्जा मिळणार नाही. कॅन्टीनचा वापर करता येणार नाही. त्यामुळे आम्ही ही योजना बंद करणार आहोत.

हे ही वाचा >> “कोणतेही नियम पाळले जाणार नाहीत, संधी मिळताच…”, दहशतवादावर एस. जयशंकर यांची ठाम भूमिका

राहुल गांधी म्हणाले, मोदींनी देशात चुकीचा जीएसटी लागू केला आहे. या जीएसटीमुळे देशातले छोटे व्यापारी संपले. लहान आणि मध्यम उद्योगधंदे बंद पडले. पाच वेगवेगळे कर, दलाली खाणारा आणि खंडणी गोळा करणारा जीएसटी आम्ही बदलणार आहोत. आम्ही सत्तेत आल्यावर देशात एक कर प्रणाली असेल. तसेच जनतेकडून कमीत कमी कर गोळा केला जाईल.