असे का होते?आयुर्वेदानुसार, वाढणारी उष्णता व शरीरातील जास्तीचे पित्त यामुळे अंत:त्वचेला इजा होऊन तोंड येते. पोट साफ नसेल तर हे लवकर बरे होत नाही.उपाय काय?* १०-१२ काळे मनुके रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते सकाळी बारीक चावून खावे.* सकाळी-सायंकाळी एक-एक चमचा गुलकंद खावा. * जखमांना ज्येष्ठमध किंवा शुद्ध गेरूची पूड लावावी.* अंजीर, द्राक्ष ही फळे खावीत. आहारात दूध, नारळ पाणी, कोथिंबीर यांचा समावेश असावा.* रोज रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.यामुळे काय होते?* पोट साफ होऊन वाढलेले पित्त शरीराबाहेर पडते. जखमा लवकर बऱ्या होतात.इतर काय काळजी घ्यावी?* आंबट, तिखट, खारट पदार्थ (उदा. दही, मसाले, लोणचे, इत्यादी.) खाऊ नयेत.* साधे उकडलेले जेवण घ्यावे.* जास्त बोलणे व जागरण टाळावे.वैद्य सदानंद सरदेशमुख