विशाखापट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर फलंदाजी आणि एकूण नियोजनावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या आक्रमकतेला चतुराईने अर्थात अधिक विचारपूर्वक तोंड देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात १९० धावांच्या पहिल्या डावातील आघाडीनंतरही भारताला सामना २८ धावांनी गमवावा लागला. घरच्या मैदानावर भारताचे पारडे जड मानले जात असताना देखील इंग्लंडने आपल्या ‘बॅझबॉल’ रणनीतीचा खुबीने वापर करून भारताला पराभूत केले. यात दुसऱ्या डावात ऑली पोपच्या १९६ धावांच्या खेळीचा प्रमुख वाटा होता.

Pune Police, Kalyani nagar accident, Juvenile Justice Board, Vishal Agarwal, prosecution, accident car, passport, court hearing, charge sheet, bail, judicial custody
कल्याणीनगर अपघात प्रकरण : मुलाविरुद्ध सज्ञान समजून खटला चालविण्याची पोलिसांची मागणी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
former pakistan cricketer basit ali advises jasprit bumrah to focus on bowling instead of captaincy
कर्णधारपदामागे धावू नकोस! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीचा बुमराला सल्ला
Surykumar Yadav react on insta story about Kolkata Doctor Rape and Murder Case
Surykumar Yadav : कोलकाता बलात्कार प्रकरणावर सूर्याची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मुलींच्या रक्षणाची नव्हे तर मुलांना सज्ञान करण्याची गरज…’
BCCI Secretary Jay Shah statement on Mayank Yadav
Mayank Yadav : ‘तो टीम इंडियात असेल…’, बीसीसीआयचे सचिव जय शाहांचे मयंक यादवबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाले, आम्ही त्याच्यावर…
wfi to challenge delhi hc
उच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशातील कुस्तीगिरांचे भवितव्य धोक्यात; भारतीय कुस्ती महासंघ आदेशाला आव्हान देणार
manu bhakar
आणखी ऑलिम्पिक पदके जिंकण्यासाठी प्रयत्नशील -मनू भाकर

हेही वाचा >>> भारतीय फलंदाजांचा फिरकीविरुद्ध कसून सराव

मालिकेतील दुसरा कसोटी क्रिकेट सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे. भारतीय संघाच्या नियोजनाविषयी बोलताना राठोड म्हणाले,‘‘भारतीय संघात असे युवा फलंदाज आहेत की जे कसोटी क्रिकेट फार कमी खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत निर्णय घेताना संयमी भूमिका घ्यायला हवी. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल हे फलंदाज गुणवान आहेत. त्यांच्याकडून धावा होतील याची आम्हाला खात्री आहे,’’असे बुधवारच्या सराव सत्रानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राठोड यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई इंडियन्सचे ‘हे’ प्रताप तुम्ही वाचलेत का?

जैस्वालने पहिल्या डावात ८० धावांची खेळी केली असली, तरी गिल आणि अय्यर दोन्ही डावांत प्रभाव पाडू शकलेले नाहीत. गिल आणि अय्यर यांनी अनुक्रमे आतापर्यंत २१ आणि १३ कसोटी सामने खेळले आहेत. गिल तर गेल्या ९ सामन्यांतून एकदाही अर्धशतक झळकावता आले  नाही. अय्यर पूर्णपणे अपयशी आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय स्तर लक्षात घेता या सगळया गोष्टी बरोबर आहेत. सलग दुसऱ्या सामन्यात विराटशिवाय खेळावे लागणार आहे. अशा वेळी संधी मिळालेल्या फलंदाजांकडून धावा होण्याची आवश्यकता आहे. ठोस सकारात्मक मानसिकतेने खेळणे आणि आक्रमक खेळणे यात मोठा फरक आहे. कसे खेळायचे हे निश्चित असावे. खेळाडूंनी ठोस उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून खेळावे अशी आमची इच्छा आहे,’’ असे राठोड म्हणाले.

फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणेला वाव

भारतीय फलंदाज गुणवान असले, तरीही त्यांच्या खेळात सुधारणेला नक्कीच वाव आहे, असे राठोड म्हणाले. खेळपट्टीचे स्वरूप आणि सामन्याची परिस्थिती पाहून निर्णय घेणे आवश्यक आहे. खेळपट्टीवर परिस्थिती लक्षात घेऊन कसे सुरक्षित खेळता येईल या विचारांचा अभाव दिसून येत आहे. यासाठीच फलंदाजांनी अधिक विचारपूर्वक  खेळण्याची गरज असल्याचे राठोड यांनी सांगितले. ‘‘ आमचे फलंदाज पारंपरिक पद्धतीने खेळले.  इंग्लंडच्या फलंदाजांनी ‘स्विप’चा चांगला वापर केला. तो आमच्या फलंदाजांना जमला नाही. त्यासाठी ‘स्विप’चा विशेष सराव आवश्यक आहे,’’ असे राठोड म्हणाले.