Indian women’s kabaddi team won the gold medal: आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला कबड्डी संघाने चायनीज तैपेई संघाचा २६-२४ असा पराभव करून सुवर्णपदकावर कब्जा केला. कबड्डीचा सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटपर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. या सुवर्णासह भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत देशाने प्रथमच १०० पदके जिंकली आहेत. भारतीय क्रीडा जगतासाठी हे चांगले संकेत आहेत.

भारत आणि चीनमधील लढत ठरली रोमांचक –

भारत आणि चायनीज तैपेई महिला संघ यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला. सुरुवातीला टीम इंडियाने आघाडी घेतली होती, मात्र नंतर चायनीज तैपेईने शानदार पुनरागमन केले आणि ९ मिनिटे शिल्लक असताना भारतीय संघ ऑलआऊट झाला. त्यामुळे विरोधी संघाने आघाडी घेतली. अशा स्थितीत स्कोअर २२-२२ असा बरोबरीत पोहोचला होता. मात्र, अखेरच्या क्षणी भारताने टच पॉइंट मिळवत सामना २६-२४ असा जिंकला.

Ranji Trophy Mumbai Beat Haryana by 153 And Enters Semi final
Ranji Trophy: चॅम्पियन मुंबई संघाची रणजीच्या सेमीफायनलमध्ये धडक, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर ठरले विजयाचे हिरो
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Maharashtra wrestling news in marathi
कुंडलच्या कुस्ती मैदानात गौरव मच्छवाडाची बाजी
BCCI Announces 5 Crore Cash Prize For India U19 Womens Team for Winning T20 World Cup
U19 World Cup 2025: भारताच्या U19 मुलींचा विश्वविजेता संघ झाला मालामाल, BCCIने जाहीर केलं कोट्यवधींचं बक्षीस
U19 T20 WC 2025 Gongadi Trisha break Shweta Sehrawat most runs record in tournament
U19 T20 WC 2025 : गोंगाडी त्रिशाने घडवला इतिहास! महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकात केला मोठा पराक्रम
India Women's Won U19 T20 World Cup 2025 2nd Time in a Row vs South Africa
India Won U19 Women’s T20 WC: भारताच्या महिला संघाने घडवला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावले U19 टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद
Pakistan cricket team announce 15 member squad for Champions Trophy
Champions Trophy: गतविजेत्या पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ केला जाहीर, या ४ खेळाडूंचं संघात पुनरागन; भारताविरूद्ध सामना कधी असणार?
India to Play Against South Africa in U19 Womens T20 World Cup 2025 What is the Match Timing
U19 Women’s T20 World Cup Final: भारताचा महिला संघ U19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत कोणाविरूद्ध भिडणार? जाणून घ्या सामन्याची वेळ

भारतासाठी उजाडली सोनेरी सकाळ –

शनिवारची सकाळ भारतीय संघासाठी सुवर्णपदक घेऊन आली. शनिवारी महिलांच्या तिरंदाजीत देशाने पहिले सुवर्ण जिंकले. यामध्ये ज्योती याराजीने भारतात सुवर्णपदक मिळवून दिले. यानंतर ओजस देवतळने पुरुष गटात आणखी एक सुवर्णपदक पटकावले. या दोघांशिवाय भारताने तिरंदाजीमध्ये कांस्य आणि रौप्यपदक जिंकले, ज्यामुळे देशाने १०० पदकांचा जादुई आकडा पार केला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची १०० पदके पूर्ण करणे ही एक महत्त्वाची कामगिरी असल्याचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, १० ऑक्टोबर रोजी भारतीय तुकडीचे स्वागत करणार आहे. पंतप्रधान मोदीं ट्विटरवर पोस्ट करताना म्हणाले, “प्रत्येक आश्चर्यकारक कामगिरीने इतिहास रचला आणि आमचे हृदय अभिमानाने भरले. मी १० ऑक्टोबर रोजी आमच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय पथकाचे स्वागत करीन आणि खेळाडूंशी चर्चा करेन.”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही १०० पदकांचा पराक्रम केला याचा भारतातील लोकांना आनंद आहे. ते म्हणाले, “आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी एक महत्त्वाची कामगिरी. मी आमच्या प्रतिभावान खेळाडूंचे अभिनंदन करतो, ज्यांच्या प्रयत्नांमुळे भारताला ही ऐतिहासिक कामगिरी करता आली.”

भारताकडे किती पदके आहेत?

सुवर्ण: २५
रौप्य: ३५
कांस्य: ४०
एकूण: १००

Story img Loader