पूर्वपरवानगी न घेताच बसवलेला महापुरुषांचा पुतळा हटवल्याने कंधार तालुक्यातील गऊळ येथे संतप्त झालेल्या नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर शुक्रवारी गावात अजूनही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत ४o जणांना ताब्यात घेतले आहे.

गऊळ येथे मध्यरात्री अज्ञातांनी महापुरुषांचा पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. कोणतीही परवानगी न घेताच हा पुतळा बसविल्याने पोलिसांनी तो हटविण्याचा आदेश दिला. मात्र ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्याने सायंकाळी पोलीस बंदोबस्तात पुतळा हटविण्यात आला आहे. सकाळी हा पुतळा दिसताच ग्रामस्थही अवाक् झाले. पोलिसांना कोणताही थांगपत्ता न लागू देता अज्ञातांनी पुतळा बसवला, मात्र सकाळी पोलिसांना पुतळा दिसल्यानंतर गावात वाद सुरू झाला. कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसविल्याने तो हटवा अशी भूमिका पोलिसांनी घेतली. पुतळा बसविण्यास विरोध नाही. पण रितसर परवानगी घेऊन तो बसवावा अशी सूचना पोलिसांनी केली. पण त्याला काही ग्रामस्थांनी विरोध केला. संबंधित पुतळा हटवू नये, आम्ही संरक्षण करू अशी भूमिका त्यांनी मांडली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रितसर परवानगीसाठी पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. तोपर्यंत हा पुतळा हटवू नये असे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले. गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण पुतळा हटवू देणार नाही, अशी भूमिका गावातील काही ग्रामस्थांनी घेतली आहे.

seven houses were burn in fire due to explosion of gas cylinder
जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
drowned
साताऱ्यातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू
Bhandara, Youth Murdered, Body Burn, Destroy Evidence, Enmity, garada village, lakhani taluka, police, crime news, marathi news,
भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..

उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांच्या उपस्थिती पुतळ्याची संरक्षण समिती स्थापना करण्यात आली. २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी मोठा फौजफाटा नेत लाठीमार करत पुतळा हटवल्याने गऊळ मोठा तणाव निर्माण झाला. याप्रकरणी ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .सदरील प्रकरणाचा पुढील तपास एपीआय लोणीकर करीत आहेत.