लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : दसरा आणि झेंडूची फुले यांचे समीकरण असल्यामुळे दसरा सणासाठी सोलापुरात झेंडू फुलांची आवक झाली आहे. झेंडूची आवक असल्यामुळे किरकोळ बाजारात प्रतिकिलो शंभर ते दीडशे रूपयांचा भाव झेंडूला आला आहे. यंदा करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर  सगळेच सण-उत्सव साध्या पध्दतीने साजरे होत आहेत. त्यातच अलीकडेच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झेंडू फूल शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांची आवक खूपच घटली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे झेंडूचा दर दसरा सणाच्या पूर्वसंध्येला दीडशे रुपये किलो पर्यंत पोहचला आहे.

सोलापुरातल्या मारुती मंदिर परिसरात फुलांचा बाजार भरतो. तेथेच पूजा साहित्याचीही विक्री होते. संध्याकाळी फुलांच्या बाजारात फुलांसह पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. वाढती मागणी पाहता झेंडू दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

Maruti Suzuki Brezza SUV
मारुतीच्या ‘या’ ५ सीटर SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; खरेदीसाठी मोठी गर्दी, मायलेज २५ किमी, किंमत…
raver lok sabha seat, Raksha Khadse increase in assets, Eknath Khadse s loan of 23 lakhs on Raksha Khadse, seven and a half crores, marathi news, lok sabha 2024, raver lok sabha 2024,
रक्षा खडसे यांच्यावर एकनाथ खडसे यांचे २३ लाखांचे कर्ज, मालमत्तेत साडेसात कोटींनी वाढ
Nashik District Consumer Forum,
नाशिक जिल्हा ग्राहक मंचातील दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात, ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी

करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असला तरी त्याचे भय कायम आहे. त्यामुळे सारे सण-उत्सव साध्या पध्दतीनेच साजरे होत आहेत. त्यामुळे सजावट, घरातील पूजा आणि पुष्पहारांसाठी भक्त आणि मंदिरांमध्ये झेंडू फुलांचा वापर दसरा सणामध्ये होतो. परंतु करोना प्रादुर्भावामुळे सर्व देवस्थाने बंदच आहेत. परिणामी झेंडूला अपेक्षित मागणी दिसत नाही. तथापि, घरगुती पूजेसाठी झेंडू फुलांना भाव आहे.
शहरात यंदा सुमारे ४० हजार किलो फुलांची आवक झाली असून सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, करमाळा, उत्तर सोलापूर आदी भागासह पुणे, नगर व इतर जिल्ह्यांतून झेंडू फुलांची आवक झाल्याचे फुल व्यापाऱ्यांनी सांगितले.

झेंडू फुलांप्रमाणेच केळीच्या खुंटांना दसरा सणात धार्मिक पूजा विधीसाठी मान असतो. अतिवृष्टीने केळीच्या बागांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. परिणामी, बाजारात विक्रीसाठी केळीचे खुंट कमी प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. केळीचे खुंटीचे एक संच ६० रूपयांस खरेदी केले जात होते.