राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघाती मृत्यू होता मात्र ही हत्याच आहे असा दावा अनेकजण करत आहेत. असाच दावा आता संजय राऊत यांनीही केला आहे. या घटनेचे पडसाद आता उमटण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळत आहेत याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी पत्रात?

मा. देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहमंत्री म्हणून राज्यात ढासळणाऱ्या कायदा सुव्यस्थेकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आपल्यासारख्या प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्याकडे राज्याच्या गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्या दिवसाढवळ्या खून पडावेत आणि संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा हे चिंताजनक आहे.

Former journalist Ketan Tirodkar arrested
केतन तिरोडकर यांना अटक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य
Life imprisonment for two accused in Dr Dabholkar murder case
तपास यंत्रणांवर ताशेरे; डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप; तिघांची निर्दोष मुक्तता
Aditya Thackeray, Amol Kirtikar,
अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात आदित्य ठाकरे तर वायकरांसाठी योगी आदित्यनाथ
salim kutta marathi news, sudhakar badgujar tadipar marathi news
शिंदे गटाच्या मेळाव्यात ’सलीम कुत्ता‘ नावाने घोषणाबाजी, दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्हा ठाकरे गटाचे प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस
Ajit Pawar On Rohit Pawar
रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्यावर काहीतरी परिणाम…”
sharad pawar replied to narendra modi
नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म्हणणं खरं आहे, पण…”
kirit somaiya sanjay raut
“हिसाब तो देना पडेगा”, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कारवाईनंतर सोमय्यांचा राऊतांना टोला
ED Attaches Assets, more than Rs 73 Crore, patra chawl fraud case, pravin raut assests, Links to Sanjay Raut, marathi news, mumbai news, ed attaches pravin raut assests, ed, sanjay raut patra chawl, pratra chawl sanjay raut
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून ७३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, खासदार संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत यांच्या मालमत्तांचा समावेश

रत्नागिरी जिल्ह्यातली राजापूर येथील तरूण पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली. या हत्येस अपघाताचे स्वरूप दिले गेले असले तरीही ही हत्याच आहे. पत्रकार वारिशे हे कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरीविरूद्ध सातत्याने आवाज उठवत होते. ते याबाबत लिखाण करत होते आणि रिफायनरीचे समर्थक म्हणवून घेणारे गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना धमक्या देत होते. रिफायनरीस कोकणातील जनतेचा विरोध आहे. आपले मत याबाबत वेगळे असले तरीही स्थानिक जनता रिफायनरीच्या विरोधात संघर्ष करते आहे. शशिकांत वारिशेसारखे पत्रकार लोकांना जागृत करत होते हे सत्य नाकारता येणार नाही. त्या वारिशे यांची हत्या होणं महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी घटना आहे. मी दोन गोष्टींकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.

४ फेब्रुवारी २०२३ च्या आंगणेवाडी जत्रेत भाजपाची एक जाहीर सभा झाली त्या सभेत आपण ठासून सांगितले की नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतो आहे पाहू आणि आपल्या वक्तव्यास चोवीस तास उलटत नाहीत तोच वारिशे यांची हत्या झाली हा योगायोग समजावा का?

दुसरा मुद्दा असा की महाराष्ट्रात घटनाबाह्य सत्तांतर झाल्यानंतर रत्नागिरीचे राजकीय पालकमंत्री आणि त्यांच्या समर्थकांनी रिफायनरीला विरोध दर्शवणाऱ्यांना धमक्या देण्यास सुरूवात केली. त्यासाठी पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी यांचीही मदत घेतली गेली. शशिकांत वारिशे यांच्यावर देखील पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांचा दबाव होता. रिफायनरीच्या विरोधात भूमिका घेतली तर परिणाम भोगावे लागली असा इशारा दिला गेला होता. आपल्या आंगणेवाडीतील भाषणाने रिफायनरी समर्थकांमधल्या गुंड प्रवृत्तींना हिरवा झेंडाच मिळाला आणि वारिशे यांची हत्या झाली असे आपणास वाटत नाही का? असा प्रश्न विचारणारं हे पत्र संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.