कराड : शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा काल शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, मानेवर वार करून निर्घृण खून झाल्याची घटना आंधळी (ता. माण) येथे घडली. तर, या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी केवळ चार तासात उलघडा केला. पूर्ववैमनस्यातून चुलत भावानेच आपल्या भाऊ व भावजयीचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय रामचंद्र पवार (४९) व त्यांची पत्नी मनीषा (४८) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तर, पोलिसांनी या गुन्ह्यात मयत संजय पवारचा चुलत भाऊ दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार (३५) यास अटक केली आहे.

जुन्या वादातून बापूराव पवारने आपल्या सख्ख्या चुलत भावाचा व भावजयीचा मध्यरात्रीच्या सुमारास ते शेताला पाणी देत असताना धारदार शस्त्राने डोक्यात, मानेवर वार करून निर्घृण खून केला. आज सकाळी काही ग्रामस्थांना शेतात संजय पवार व त्यांची पत्नी मनीषा हे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले होते. या गुन्ह्याची नोंद दहिवडी पोलिसात झाली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The couple who went to water the field were killed in karad amy