तूर प्रतििक्वटल १३ हजारांवरून ५ हजारांवर

सोयाबीन, मूग या शेतमालाची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने झाली. त्यानंतर गतवर्षी १३ हजार रुपये प्रतििक्वटल असणारा तुरीचा भाव घसरून तो आता ५ हजार रुपयांवर आला आहे. बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी भावाने तुरीची खरेदी होईल, हा जाणकारांचा अंदाज खरा ठरला आहे.

Nagpur, Gold Prices Drop, Continuous Increase, gold price drop in nagpur, nagpur gold price, today gold price, gold price decrease, gold in nagpur, nagpur news, gold news, marathi news,
खूशखबर…. सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीचे दरही ३ हजारांनी घसरले
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Solapur recorded the highest degree Celsius maximum temperature in the state
दोन दिवस होरपळीचे! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, रात्रीच्या उकाडय़ातही वाढीचा अंदाज
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

डिसेंबर महिन्यात कर्नाटक प्रांतातील तूर लातूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जाते. सध्या दररोज सुमारे ३ हजार िक्वटल कर्नाटक तुरीची आवक आहे. पुढील महिन्यापासून लातूर परिसरातील तुरीची आवक सुरू होईल. कर्नाटकात तुरीचा भाव ४ हजार ८०० रुपये प्रतििक्वटल आहे. लातूर बाजारपेठेत सध्याचा भाव हा ५ हजार रुपये ते ५ हजार २०० असा आहे. सध्या तुरीची आवक कमी असल्यामुळे हा भाव असला, तरी जेव्हा स्थानिक शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येईल तेव्हा भावात घसरण होईल, असा अंदाज आहे. राज्य शासनाच्या हमीभावाने तूर खरेदी करण्याची केंद्रे सुरू झाली असली, तरी या केंद्रात विकलेल्या मालाचे पसे शेतकऱ्याला किमान दीड ते दोन महिन्यानंतर मिळतात. शेतकरी पशाची गरज लक्षात घेऊन आपल्या गरजेपोटी कमी दराने स्वखुशीने शेतमाल विकत असल्याचे लिहून देतो व खरेदीदार यातून स्वत:ची सुटका करून घेतात व सर्रासपणे हमीभावापेक्षा कमी भावाने मालाची विक्री होते. जगभर तुरीचा पेरा वाढला. भारतातील तूर डाळीची गरज लक्षात घेऊन विविध देशांनी भारताला तूर डाळ निर्यात करता यावी, यासाठीचे धोरण आखले व त्यातून कमी दराने भारतात तूर डाळ पाठवली जात आहे. याच वेळी स्थानिक शेतकऱ्यांनी तुरीचे भाव वाढल्यामुळे मोठय़ा प्रमाणात तुरीचा पेरा केला व सुदैवाने या वर्षी तुरीचे विक्रमी पीक येते आहे. पुरवठा अधिक व तुलनेने मागणी कमी या सूत्रामुळे तुरीचे भाव पडलेले आहेत.

तुरीच्या भावातील ही घसरण विक्रमी आहे. भावातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मात्र या वर्षी कंबरडे मोडणार आहे. उत्पादन अधिक झाले असले तरी प्रत्यक्षात मिळणारा पसा अतिशय कमी असल्यामुळे पिकले तरी अडचण, नाही पिकले तरी अडचण अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. सरकारने हमीभावाने खरेदी करणारी केंद्रे कार्यक्षमतेने कार्यान्वित केली, तरच कदाचित तुरीचा भाव स्थिर राहील अन्यथा हमीभावापेक्षा कमी भावाने तुरीची खरेदी सर्रास सुरू राहील. रब्बी हंगामातील हरभऱ्याचे उत्पादनही या वर्षी विक्रमी आहे. सध्या विदेशातील आणलेल्या हरभऱ्याला भाव प्रतििक्वटल ९ ते १० हजार रुपये आहे. स्थानिक शेतकऱ्याचा हरभरा जेव्हा बाजारपेठेत येईल, तेव्हा देखील हरभऱ्याच्या भावात घसरण होऊन तो  ५ हजार रुपयांपर्यंत उतरेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे.

शेतकरीहिताची भाषा विरोधी पक्षात असताना भाजपाने केली होती. सत्तेवर येऊन आता दोन वष्रे उलटून गेली असली, तरी शेतकऱ्यांचे हित साधले जात नाही याबद्दल शेतकरीवर्गात कमालीची नाराजी आहे.