एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’, ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपली विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटानंतर त्यातील प्रत्येक कलाकार चर्चेत आला. मुख्य कलाकार प्रभास हा तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या नात्याविषयी सर्वत्र चर्चा होऊ लागली. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात होतं. या सर्व चर्चांवर अखेर प्रभासनं मौन सोडलं आहे.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत प्रभासला अनुष्काबद्दल विचारलं असता तो म्हणाला, ”अनुष्का आणि मी खूप चांगले मित्र आहोत. आमच्यात खरंच काही सुरू असतं तर गेल्या दोन वर्षांत आम्ही कोणालातरी एकत्र दिसलो असतो. करण जोहरनेही मला त्याच्या चॅट शोमध्ये हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी राजामौली आणि राणा यांना उत्तर द्यायला सांगितलं होतं. त्यांनीसुद्धा आमच्यात काहीच नसल्याचं स्पष्ट केलं होतं.”

Sacred Games 2: दुसरा सिझन प्रदर्शित होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर

प्रभास आणि अनुष्का लॉस एंजल्समध्ये घर विकत घेत असल्याच्या वृत्तावरून या दोघांच्या लग्नाबद्दलच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण प्रभासने काहीच नसल्याचं स्पष्ट केल्याने लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.