सध्याची सर्वात लोकप्रिय आणि चर्चेतील मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ ही मालिका टीआरपीच्या यादीमध्ये नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असते. या मालिकेतील शनाया, गुरुनाथ सुभेदार आणि राधिका सुभेदार या तीन पात्रांची केमेस्ट्री पाहण्यासारखी आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मालिकेत राधिकाचा मित्र सौमित्रची एण्ट्री झाली आहे. राधिका आणि सौमित्रच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे.

ज्याप्रमाणे शनाया आणि गॅरीची जोडी चाहत्यांना एकत्र पाहायला आवडते त्याचप्रमाणे आता राधिका आणि सौमित्रची जोडीही चाहत्यांच्या पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिका सध्या एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. राधिकाने सौमित्रच्या आईचे मन जिंकून लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता लवकरच त्या दोघांचा साखरपुडा होणार आहे.

स्वावलंबी राधिकाने गुरुनाथला घटस्फोट देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा निश्चय केला आहे. एकीकडे राधिका आणि सौमित्रच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहेत तर दुसरीकडे पश्चाताप झालेला गुरु राधिका आणि सौमित्रचा साखरपुडा कसा तोडता येईल याचा विचार करत आहे. त्यासाठी पूर्ण तयारी निशी गुरु राधिकाच्या साखरपुडा सोहळ्यात पोहोचतो आणि राधिकाला पुन्हा एकदा विचार करण्यास सांगतो. मात्र गुरुच्या बोलण्याचा राधिकाला काडीमात्र फरक पडत नाही. राधिका गुरुला साखरपुडा सोहळ्यातून निघून जाण्यास सांगते. गुरु इतक्यावरच थांबणार का? की राधिका आणि सौमित्रचे लग्न मोडण्यासाठी आणखी काही खेळ रचणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.