‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका सुरू झाली. या मालिकेमध्ये रेश्मा शिंद आणि सुमीत पुसावळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता लवकरच या मालिकेत प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सारंगचा हळदी सोहळा पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी खास सायली उपस्थित राहणार आहे.

‘ठरलं तर मग’मधील सुभेदारांची सून सायली ऐश्वर्या आणि सारंगच्या हळदी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ सेटवरचा व्हिडीओ शेअर करत सायलीने “ऐश्वर्या आणि सारंगच्या हळदी सोहळ्याला नक्की यायचं हं..!” असं कॅप्शन दिलं आहे.

tharala tar mag sayali arjun finds evidence against sakshi
ठरलं तर मग : अर्जुन-चैतन्यमध्ये दिलजमाई! अखेर साक्षीचा खोटेपणा होणार उघड, साखरपुडा मोडणार? पाहा नवीन प्रोमो…
Tharala Tar Mag Fame amit bhanushali will entry Mi Honar Superstar Jodi Number 1 show
Video: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेता अमित भानुशाली झळकणार नव्या भूमिकेत! पाहा व्हिडीओ
Tharala Tar Mag arjun sayali chaitanya sakshi dance performance at engagement ceremony viral video
VIDEO: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली आणि चैतन्य-साक्षीने केला साखरपुड्यादिवशी मजेशीर डान्स; चाहते म्हणाले, “वेडे आहात तुम्ही”
Tharala tar mag promo priya tells sayali arjun contract marriage truth to subhedar family
ठरलं तर मग: सुभेदार कुटुंबासमोर प्रिया उघड करणार सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य? पाहा प्रोमो
tharala tar mag special episode sayali confess her love for arjun
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आलाच! सायली कुसुमसमोर देणार प्रेमाची कबुली पण, निर्माण होणार मोठा गैरसमज…
Tharala tar mag promo Chaitanya told sakshi about arjun and sayali contract marriage
ठरलं तर मग: अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आलं साक्षीसमोर; चैतन्य खुलासा करत म्हणाला “ते खरे नवरा बायको…”
Tharala Tar Mag Actress Jui Gadkari has to hide her tattoo every day
‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीला रोज लपवावा लागतो ‘हा’ टॅटू; अभिनेत्रीने व्हिडीओ केला शेअर
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

हेही वाचा : अधिपतीची शिकवणी घेणार नव्या मास्तरीणबाई! मालिकेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, अक्षराच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला

सध्या रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. खरंतर दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला. मात्र सौमित्रने अवंतिकासोबतच लग्न करण्याचं ठरवत ऐन लग्नाच्या धामधूमीत पळून जायचं ठरवलं. यामुळे संतापलेल्या ऐश्वर्याला सौमित्रबरोबर लग्न करायचं आहे. त्यासाठी तिने सारंगशी लग्न करण्याचं ठरवत नवा डाव आखलाय. परंतु, सौमित्रला किडनॅप करुन ऐन मांडवात सारंगऐवजी सौमित्रबरोबरच लग्न करण्याचा तिचा डाव आहे. ऐश्वर्याचा हा डाव यशस्वी होणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडेल.

हेही वाचा : ‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से

ऐश्वर्याचं लग्न कोणाबरोबर होणार याची उत्कंठा असली तरी विखेपाटील आणि रणदिवे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झाली आहे. हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न सगळं काही अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ‘ठरलं तर मग’ मालिकेतली सायली येणार आहे. मेहंदी, संगीत आणि लग्नातही स्टार प्रवाह परिवारातले सदस्य खास हजेरी लावणार आहेत.