मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या ‘कोविड लस अमृत महोत्सवा’ला मुंबईत अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला. ७५ दिवसांसाठी असलेला हा महोत्सव ३० सप्टेंबरला संपला असून या काळात केवळ साडेचार लाख नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली. एकूण ७८ लाख पात्र लाभार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ५.२६ टक्के आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने ‘करोना लस अमृतमहोत्सव’ देशभरात साजरा करण्यात आला. मुंबईतही १५ जुलैपासून हा कार्यक्रम सुरू झाला. यामध्ये १८ वर्षांवरील ज्या पात्र लाभार्थ्यांनी करोना लशीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ६ महिने अथवा २६ आठवडे पूर्ण झालेले आहेत, त्यांना वर्धक मात्रा (प्रिकॉशन डोस) विनामूल्य दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मुंबईतही लसीकरण केंद्रावर सुरुवात झाली होती. मुंबईकरांनी मात्र वर्धक मात्रेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special covid vaccination drive get low response in mumbai zws