बहुजन समाज पक्ष (BSP) च्या अध्यक्षा मायावती उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपाच्या रडारवर नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह भाजपाच्या प्रमुख प्रचारकांच्या सभांमध्ये मायावतींविरोधात चकार शब्दही काढलेला नसल्याचे दिसून आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी अनेक आठवड्यांपासून राज्यभर संबोधित करीत असतानाही त्यांनी मायावतींचा उल्लेख केलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांच्या भाषणांनी विरोधी गोटात फक्त काँग्रेस आणि समाजवादी पक्ष (SP) आणि त्यांचे नेते विशेषतः राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील आतापर्यंतच्या त्यांच्या सभांमध्ये पंतप्रधान मोदी, शाह आणि आदित्यनाथ यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित न राहिल्याबद्दल काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल, प्रियंका गांधी आणि पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. २२ जानेवारीपासून आतापर्यंत मंदिरात न आल्यानं भाजपाने त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. मात्र, यापैकी कोणीही मायावतींवर आतापर्यंत यासंदर्भात टीका केलेली नाही.

याउलट २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या प्रचारात जेव्हा सपा आणि बसपाने निवडणूकपूर्व युती केली होती, तेव्हा पंतप्रधान मोदी, शाह आणि आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या स्टार प्रचारकांनी “बुवा-बबुआ” किंवा “बुवा” यांसारखी वाक्ये तयार केली होती. भाजपा नेते पूर्वीच्या सपा सरकारवर “गुंडागर्दी” आणि माजी बसपा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असे.

हेही वाचाः उमेदवारांची भूमिका : दक्षिण मुंबई- मतदार माझ्या कामाची पावती देतील- यामिनी जाधव

निवडणुकीच्या निकालानुसार भाजपाची संख्या २०१४ मध्ये ७१ वरून ६२ जागांवर (राज्यातील ८० जागांपैकी) कमी झाली. बसपाला १० आणि सपाला पाच जागा मिळाल्या. मायावतींनी मात्र निवडणुकीनंतर लगेचच अखिलेशबरोबरची युती तोडली. २०२२ च्या यूपी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील भाजपा नेत्यांनी मायावतींवर हल्ला चढवला, परंतु तो त्यांच्या २०१९ च्या हल्ल्यापेक्षा सौम्य होता.

यावेळी उत्तर प्रदेशमधील बसपा उमेदवारांसाठीच्या त्यांच्या निवडणूक रॅलींमध्ये मायावती काँग्रेस आणि सपासह भाजपावर टीका करत आहेत. मायावतींचा पुतण्या आकाश आनंद यानेही सुरुवातीच्या टप्प्यात विरोधकांवर निशाणा साधला होता. बेरोजगारी, शिक्षणाची खराब स्थिती यावरून तो योगी सरकारला दहशतवाद्यांचे सरकार म्हटल्याची टीका करीत असल्याचे दिसून आले. आकाशच्या भाषणांमुळे दलित तरुणांच्या एका वर्गात त्याचा क्रेझ वाढला होता. ज्यांनी त्याला बसपा फायरब्रँड नेते म्हणायला सुरुवात केली होती, परंतु पक्ष नेतृत्वाने आकाशला अचानक दिल्लीला परत पाठवले. आयपीसी आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलमांखाली द्वेष आणि शत्रुत्वाला चिथावणी देण्यासाठी आकाशवर सीतापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर लगेचच हे घडले. २८ एप्रिल रोजी सीतापूर येथील रॅलीत केलेल्या भाषणात आकाशने कथितपणे भाजपा सरकारला देशद्रोही सरकार असे संबोधले.

त्यानंतर मायावतींनी आकाशला त्यांचा राजकीय वारस आणि पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक होण्यास अपरिपक्व असल्याचे सांगत पक्षातून काढून टाकले. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी त्यांनी त्याला आपला उत्तराधिकारी म्हणून नाव दिले होते. भाजपा नेत्यांनी आकाशच्या वक्तव्यावर तसेच मायावती यांच्यावरील कारवाईवर भाष्य करण्याचे टाळले. अखिलेश यांनी X वर एका पोस्टद्वारे मायावतींच्या हालचालीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि असे म्हटले की, “बसपाने त्यांच्या संघटनेत मोठ्या बदलासाठी जी काही पावले उचलली आहेत, ती त्यांची अंतर्गत बाब आहे. पण बहुसंख्य बसपा समर्थक इंडिया आघाडीला मतदान करीत आहेत.” सपा प्रमुखांनी बसपाच्या समर्थकांना त्यांची मते वाया न घालवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या प्रचारात त्यांनी आता “बहुजन समाजाला” देखील आवाहन करण्यास सुरुवात केली आहे आणि आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी त्यांची मते मागितली आहेत.

मायावतींवर हल्ला चढवू नये म्हणून त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी चामार (पश्चिम उत्तर प्रदेशातील जाटव), धोबी, पासी, अहिरवार, कुरेल, दोहरे, डोम, दुसध या दलित पोटजातींना आकर्षित करण्याच्या त्यांच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले. मध्य आणि पूर्व उत्तर प्रदेशातील ४० हून अधिक मतदारसंघांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खरवार आणि मुशर मायावतींना सत्ताधारी पक्षाविषयीच्या त्यांच्या मवाळ भूमिकेबद्दल कथितपणे “भाजपाची बी टीम” असल्याच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे, विशेषत: मायावती यांनी आकाशला काढून टाकल्यानंतर बसपावर टीका होत आहे.

बसपाच्या ८० उमेदवारांपैकी मायावतींनी २० मुस्लिम चेहरे दिले

मात्र, बसपाचे फिरोजाबादचे उमेदवार चौधरी बशीर यांनी त्यांच्या मुस्लिम-दलित फॉर्म्युल्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ७ मे रोजी मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर समोर आलेल्या एका अलीकडील व्हिडीओमध्ये बशीर कथितपणे आपला पराभव स्वीकारत असल्याचे दिसते. मुस्लिम समुदायाने सपाला मत दिले आहे, त्यांना नाही, असंही ते सांगत आहेत. सपा सरचिटणीस रामगोपाल यादव यांचा मुलगा अक्षय हा मुस्लिम आणि यादव मतदारांचे वर्चस्व असलेल्या फिरोजाबाद जागेवर उमेदवार आहे. मायावतींनी मुस्लिम-दलित किंवा मुस्लिम-ओबीसी (विशेषतः यादव) मतदारांचे वर्चस्व असलेल्या जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. अशी जातीय समीकरणे असलेल्या जागांमध्ये मुरादाबाद, एटा, बदाऊन, आओन्ला, पिलीभीत, कन्नौज, आंबेडकर नगर, अवस्ती डोमरियागंज, संत कबीर नगर, महाराजगंज आणि आझमगढ या जागांचा समावेश आहे. सपाने यापैकी एकाही जागेवर मुस्लिम चेहरा उतरवलेला नाही. या जागांवर बसपाचे उमेदवार मात्र आहेत. बसपाची भाजपा किंवा सपाशी सरळ लढत नाही. त्यामुळे मुस्लिम-दलित किंवा मुस्लीम-ओबीसी समीकरणातून वरचढ ठरण्याची बसपाची रणनीती कामी आलेली दिसत नाही, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. तसेच आकाशला प्रचाराच्या निवडणुकीपासून दूर ठेवल्याने बसपावर विपरित परिणाम झाला आहे, कारण मायावतींना शेवटच्या तीन टप्प्यांतील उर्वरित ४१ मतदारसंघांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी एकट्याने प्रचार करणे शक्य होणार नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp silence on mayawati sparks discussion of b team after sudden ousting of her nephew vrd