माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेचे चित्र ह्रदयविदारक असून, मदत आणि पुनर्वसनासाठी राज्य सरकारला हवी असलेली सर्वोतोपरी मदत करण्यास केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले. राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सकाळी माळीणमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्याच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे हेदेखील होते. घटनास्थळाची पाहणी केल्यावर राजनाथ सिंह यांनी ही खूपच गंभीर नैसर्गिक दुर्घटना असल्याचे स्पष्ट केले. इथे एक गाव होते, असे आता वाटतच नाही, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, माळीणबद्दल समजल्यावर कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला इकडे जाण्यास सांगितले. काल रात्रीच मी इथे येणार होतो. मात्र, इथे लाईटची सोय नसल्याने रात्री भेट देणे सुयोग्य नसल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे आज सकाळी मी इथे आलो आहे. इथे काल सकाळपर्यंत घरे होती, मंदिर होते, असे आता वाटतच नाही. ४७ घरे मातीच्या ढिगाऱयाखाली दाबली गेली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून मला सांगण्यात आले. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) उत्तर प्रकारे काम करीत आहेत. त्यांना सर्व मदत करण्यास केंद्र सरकार तयार आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत बुधवारीच जाहीर केली आहे.

shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Thane, Badlapur, Shambhuraj Desai,Investigation into Violent Badlapur Railway Protest, railway protest,
बदलापुरातील रेल रोको आंदोलनाची चौकशी केली जाणार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
Balasaheb Shivarkar demanded that the ladaki bahin scheme should be implemented for all
‘लाडकी बहीण’ बाबत माजी राज्यमंत्र्यांची मोठी मागणी म्हणाले…!
Chhagan Bhujbal , Nar-Par ,
Chhagan Bhujbal : नार-पारविषयी माझी भूमिका हा योग्य पर्याय – छगन भुजबळ यांचा दावा
Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that the importance of independence was highlighted because of Bangladesh
बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
Ajit Pawar, Ladki bahin yojna, Ravi Rana,
काही ‘महाभाग’ योजनेचे पैसे परत घेण्याचे वक्तव्य करतात, अजित पवारांची आमदार रवी राणांवर टीका