महाराष्ट्रात यंदा कमी पर्जन्यमान असले तरी घाटमाथ्याच्या भवताली मात्र त्याचे अस्तित्व यंदाही ‘हिरवाई’चा बहर फुलवत आहे. सिन्नरजवळील पट्टा किल्ल्याच्या परिसरातील हे असेच दृश्य. साऱ्या दऱ्याखोऱ्या या पावसात धुंद झाल्या आहेत. भात खाचरे पाणी पिऊन तृप्त झाली आहेत. या निसर्गचित्राकडे पाहिले की, नकळतपणे सगळय़ांच्याच ओठांवर ‘श्रावणमासी’ हे गीत उमटत आहे.