लोकशाहीत विरोधी पक्षांचे अस्तित्व मान्य करणारे आणि त्यांचा सन्मान करणारे अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाजपमध्ये लोकप्रिय आणि जगन्मित्र राहिलेले सुषमा स्वराज आणि अरुण जेटली या दोन्ही नेत्यांचे अकाली निधन ही या वर्षांतील दु:खद बाब. या दोघांच्या जाण्याने समन्वयवादी भाजपचीही अखेर झाली, असे म्हटले जाते.