भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा ट्वेन्टी-२० सामना २७ डिसेंबरला अहमदाबादला होणार होता. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) विनंती केल्यामुळे हा सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांच्या पाचव्या स्मृतिदिनीच हा सामना होता. त्यामुळे पीसीबीने हा सामना पुढे ढकलण्याची विनंती केली. आता हा सामना २८ डिसेंबरला होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. पाकिस्तानचा संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि दोन ट्वेन्टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी वर्षांखेरीस भारतात येणार आहे.