scorecardresearch

भारतीय रेल्वे Videos

भारतामध्ये पहिली रेल्वे (Indian Railway) धावल्यानंतर काही वर्षांमध्ये ब्रिटीशांनी देशभरामध्ये त्यांच्या सोयीसाठी रेल्वेचे जाळे पसरले. मे १८३६ मध्ये भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली असे म्हटले जाते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ मध्ये या विभागाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वे विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. रेल्वेच्या या जाळ्याची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा असलेल्या भारतीय रेल्वेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

या विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर करताना रेल्वे विभागाच्या भांडवली खर्चासाठी एकूण २.४० लाख कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे सांगण्यात आले. तेरा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी रेल्वे विभागामध्ये कार्यरत आहेत.
Read More
समुद्रात भराव घालून उभे राहिले 'हे' रेल्वे स्थानक | गोष्ट मुंबईची: भाग १४३
समुद्रात भराव घालून उभे राहिले ‘हे’ रेल्वे स्थानक | गोष्ट मुंबईची: भाग १४३

चर्चगेट रेल्वे स्थानकाशेजारीच असलेल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीस यंदा तब्बल १२५ वर्षे पूर्ण झाली. या इमारतीची उभारणी, त्या मागचा इतिहास…

ताज्या बातम्या