scorecardresearch

name astrology Videos

भारतीय परंपरेत ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्व आहे. अवकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या बदलत्या स्थितीवरुन मानवाच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. बाळाच्या जन्माच्या वेळी जन्मतिथी, वेळ, दिवस, स्थळ अशा गोष्टी फार महत्त्वपूर्ण समजल्या जातात. यावरुन कुंडली तयार केली जाते. जन्मतिथीवरुन नावाचे आद्याक्षर ठरत असते. कुंडलीनुसार लिशिष्ट आद्याक्षरावरुन नाव ठेवणे योग्य समजले जाते. व्यक्तीच्या नावावरुन किंवा नावाच्या आद्याक्षरावरुन त्या-त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, धनसंपत्ती अशा काही गोष्टींचा अंदाज लावला जाऊ शकतो. नावाच्या पहिल्या अक्षराच्या मदतीने व्यक्तिमत्त्वामधील गुण-दोष शोधले जाऊ शकतात. ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीपासून ते नावाच्या आद्याक्षराच्या सहाय्याने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला जातो. Read More