नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.
ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
देवतांच्या नावावर मते मागितल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहा वर्षे निवडणुका लढविण्यास अपात्र करावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.
पुणेकर हुशार आहेत, एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल तर गाडीची हवा काढतात. विरोधकांचीही हवा काढून नक्कीच हवा काढणार आहेत, असे भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले.
शिवरायांचे वारसदार उदयनराजे भोसले हे भाजपने उमेदवार दिलेत. साताऱ्यात पूर्वापार भगवा फडकण्याची परंपरा असल्याने आताही उदयनराजेंच्या विजयाचा भगवाच फडकेल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
काँग्रेसला मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही आणि ते धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्नही करू शकणार नाहीत, असे ठणकावून सांगताना, भाजप संविधान बदलणार या विरोधकांच्या आरोपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार खंडन केले.
सरकारची चुकीची धोरणे, वाढती महागाई आणि सत्तेचा आलेला उन्माद यातून सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल करणाऱ्या मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे मत शरद पवार यांनी वाई येथील सभेत व्यक्त केले.
महाराष्ट्रात ४० आमदार असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर १०५ आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, निवडणुकीचे जाहीरनामे या काही शोभेच्या वस्तू नसतात. प्रसारमाध्यमांनी त्याचं विश्लेषण करायला हवं. त्यातल्या बारीक-सारीक मुद्द्यांचा अभ्यास करायला हवा, मात्र काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भारतातली प्रसारमाध्यमांनी काहीच केलं नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने गेल्या अनेक दशकांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील (ओबीसी) लोकांचा विश्वासघात केला आहे.
देशभरातील विरोधी पक्ष सातत्याने भाजपावर आणि पंतप्रधान मोदींवर आरोप करत आहेत की मोदी पुन्हा सत्तेवर आले तर ते देशाचं संविधान बदलतील, लोकांचं आरक्षण काढून घेतील, या आरोपांना मोदी यांनी सोलापूरच्या सभेतून उत्तर दिलं.
त्यांच्या हाती एवढ्या मोठ्या देशाची सत्ता सोपविल्यास देशात पुन्हा भ्रष्टाचार आणि दहशतवाद होऊन देशाची फाळणी होईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.