नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.
ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
राहुल गांधी यांनी शक्तीविरोधात लढत असल्याचं रविवारी सांगितलं होतं. या शक्ती शब्दावरून मोदींनी टीकास्र डागलं. या टीकेलाही राहुल गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले, जे लोक गुन्हेगार आहेत, लॉटरी किंगसारखे लोक, ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यांच्यावर कारवाया झाल्या आहेत, अशा काही लोकांची नावं निवडणूक रोख्यांच्या यादीत पाहायला मिळाली आहेत.
तसेच शनिवारी आणखी १० मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राहुल गांधींच्या मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसकडून यापैकी बहुतेक घोषणांचं आश्वासन देण्यात आलं आहे.
आपल्या निवडणुका अधिकाधिक अध्यक्षीय पद्धतीच्या कशा होत चालल्या आहेत हे ‘लोकसत्ता’नं याच स्तंभात दहा वर्षांपूर्वी नरेंद्रोदय होण्याआधी लिहिलं तेव्हा एक विचारशून्यवर्ग खूप रागावला. आता हा प्रश्न निकालात निघाल्याचं या मंडळींनाही मान्य होईल.