छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या काळात मराठवाड्यात एप्रिलमध्ये २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बुधवारी दत्ता काशिनाथ महिपाल-पाटील या २५ वर्षीय शेतकरी तरुणाने आत्महत्या केली. त्याने माजलगाव येथील गोपाळा बँकेकडून एक लाखांचे कर्ज घेतले होते. एका बाजूला आत्महत्यांचा आकडा वाढत असतानाच मराठवाड्यातील पाणीपातळी घसरली असून टँकरची संख्या १७५८ एवढी झाली आहे.

हेही वाचा >>> बीडमध्ये एक कोटींची लाच मागणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात तक्रार

Yavatmal, Badlapur incident, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, women's safety, Shakti Act, severe punishment, public sentiment, Maharashtra politics
बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Violent protests in Assam over the gang rape of a minor girl
आसाममध्ये जोरदार निदर्शने; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष
Neelam Gorhe, Maha vikas Aghadi, Ladki Bahin yojana,
Neelam Gorhe : महिलांचा सरकारवरील विश्वास उडावा म्हणून षडयंत्र, लाडकी बहीण योजनेवर नीलम गोऱ्हे यांचे विधान
The Central Election Commission ordered the state government to transfer the officers of Revenue Police Excise Municipalities Corporations politics
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत
new cyber police station, Thane
ठाण्याला नवे सायबर पोलीस ठाणे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटनाची शक्यता
Nashik Municipal Corporation,
नाशिक महापालिकेच्या संशयास्पद भूसंपादनाच्या चौकशीचे आदेश, भाजप आमदाराकडून तक्रार

बीड जिल्ह्यात जेव्हा जातीय प्रचाराने टोक गाठले होते तेव्हा (एप्रिल महिन्यात) सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. प्रचार काळात कृषी मालाच्या पडलेल्या भावाचा मुद्दाही चर्चेत आला होता. अनेक भागांत शेतकऱ्यांनी उमेदवारांना घसरलेल्या भावावरून प्रश्न विचारले.

दीड वर्षापूर्वी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्यांच्या अनुषंगाने तयार केलेल्या अहवालानुसार २०१२ ते २०२२ पर्यंत ८,७१९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथील दत्ता कालिदास महिपाल याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘बँकेकडून तगादा सुरू असल्याने त्रस्त आहे. मोठे कर्ज घेणारे परदेशी पळून जातात आणि छोट्या कर्जदारांना बँक त्रास देते,’’ असे म्हटले आहे.