प्रत्येक जीवात अविनाशी ब्रह्म आहे, आत्मा आहे, हे पैठणच्या ब्रह्मवृंदाला मान्य होत नव्हतं. संन्याशाची मुलं म्हणून ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची मुंज करायला त्यांनी नकार दिला. सगळीकडे एकच चैतन्य, एकच ब्रह्म भरून राहिले आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्ञानोबांनी रेडय़ाला वेदघोष करायला सांगितलं. या प्रसंगाचं वर्णन करताना एकनाथ महाराज लिहितात, ‘रेडय़ामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा..’ या ज्ञानोबांवर सर्व संतांनी, सर्व महाराष्ट्राने खूप प्रेम केले. पैठणचा ब्रह्मवृंद या प्रसंगानंतर  ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई यांना शरण गेला.

यानंतर गावोगावी भागवत धर्माचा प्रसार करीत ही भावंडं नेवाशाला आली. येथील प्रवरा नदीत स्नान केल्यानंतर नेवाशाला महादेवाच्या मंदिरात ही भावंडे आली. इथे निवृत्तिनाथांच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरील भाष्य, म्हणजे ज्ञानेश्वरी लिहायला घेतली. अमृतानुभव, अनेक अभंग, गौळणी, पसायदान कीर्तन जे जे शक्य होत ते केल्यानंतर ज्ञानोबांनी समाधी घेण्याचे ठरवले. त्या वेळी निवृत्तिनाथांच्या मनाची अवस्था नामदेवांनी अतिशय हृदयस्पर्शी शब्दांत लिहिली,

Mumbai Navnirman vidnyan prabodhan
सर्वकार्येषु सर्वदा: विज्ञान प्रसाराला हवी आर्थिक पाठबळाची जोड
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
shinde shiv sena activist throwing currency notes in anand ashram video viral on social media
आनंद दिघे यांच्या आश्रमात नोटांची उधळण; समाजमध्यमांवर चित्रफीत प्रसारित,ठाकरे गटाची शिंदे गटावर टीका
after facing lots of difficulties two come together and become one forever
वर्धा : तो अनाथ, ती दिव्यांग ! प्रेमाच्या आणाभाका आणि कुटुंबाचा विरोध झुगारून शुभमंगल.
ganesh Chaturthi 2024 astrology
गणपती बाप्पांच्या आगमनाने उघडणार ‘या’ तीन राशींसाठी नशीबाचे दरवाजे; आजपासून प्रचंड धनलाभ, तुमची रास यात आहे का?
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
Descriptions of Lord Ganesha by various sants
बुद्धिदेवता ओंकारब्रह्म
buldhana shegaon gajanan maharaj today114th death anniversary
संतनगरी शेगावात गजानन महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रम

निवृत्ती देव म्हणे करिता समाधान,

काही केल्या मन राहत नाही,

बांधल्या तळ्याचा फुटला असे पाट,

ओघ बारा वाट मुरडताती..

माय बापे आम्हा त्यागीयेले जेव्हा,

ऐसे दु:ख तेव्हा झाले नाही ..

आईवडील गेले त्या वेळीही इतके दु:ख झाले नाही, एवढे माझा ज्ञाना आता दिसणार नाही म्हणून दु:ख होते आहे. निवृत्तिनाथ एवढे ज्ञानी, तरीदेखील त्यांना शोक आवरत नव्हता. खरोखर ज्यांच्यावर आपले खूप प्रेम असते त्यांचा वियोग सहन करणे किती कठीण आहे नाही का? एकदा माणूस पंचत्वात विलीन झाला की, पुन्हा त्याचे दर्शन नाही. भक्ती आणि उपासना हाच दु:ख कमी करण्याचा मार्ग आहे, हेच संत सांगतात.

-माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com