आसाम विधानसभा निवडणुकीत जातीयवादी भाजप आणि भ्रष्टाचारी काँग्रेसचा पराभव करण्याचे आवाहन माकपने केले आहे. माकपने सोमवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. जातीयवादी भाजपचा पराभव करणे अत्यावश्यक आहे तर भ्रष्टाचारी काँग्रेसचा पराभव करणेही तितकेच गरजेचे आहे, असे पक्षाचे राज्य सचिव देवेन भट्टाचार्य यांनी सांगितले.

जातीयवादी भाजप सत्तेवर आल्यास आसाममधील समाजाला सर्वाधिक धोका असल्याची आपल्याला जाणीव आहे, तर राज्यात अनियमिततेच्या पातळीने कळस गाठलेला असल्याने भ्रष्टाचारी काँग्रेसलाही धूळ चारणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे भट्टाचार्य म्हणाले.

काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचणे, भाजपचा पराभव करणे आणि डाव्यांची ताक वाढविणे या बाबत जाहीरनाम्यात मुख्यत्वे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. आसाम विधानसभेच्या १२६ जागांपैकी माकप १९ जागा लढविणार आहे.