पीटीआय, टोरांटो

खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येबाबत वाद उद्भवल्यानंतर, भारत व कॅनडा यांच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या संख्येत समानता आणण्यासाठी कॅनडाने त्याच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याकरिता भारताने त्या देशाला १० ऑक्टोबरची मुदत दिली होती. यानंतर, कॅनडाने भारतात नवी दिल्लीबाहेर काम करणाऱ्या त्याच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांपैकी बहुतेकांना एक तर मलेशिया अथवा सिंगापूरमध्ये हलवले असल्याचे वृत्त एका माध्यमाने शुक्रवारी दिले.

two new US-India agreements
भारत आणि अमेरिकेने संरक्षण करारावर केली स्वाक्षरी; काय आहेत दोन नवीन करार? याचा भारताला कसा फायदा होणार?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
PM Narendra Modi advice to Ukraine Russia for a solution to the war
युक्रेन-रशिया चर्चा आवश्यक! युद्धावर उपायासाठी पंतप्रधान मोदींचा दोन्ही देशांना सल्ला
wfi to challenge delhi hc
उच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशातील कुस्तीगिरांचे भवितव्य धोक्यात; भारतीय कुस्ती महासंघ आदेशाला आव्हान देणार
independence day 2024
अग्रलेख: स्वातंत्र्य… आपले आणि त्यांचे!
Fact Check Bangladesh Islamists attacked Hindu man of the village
VIDEO: बांगलादेशात हिंदू व्यक्तीवर क्रूर हल्ला? जमावाने पाण्यात उभं करून केली दगडफेक; नक्की घडलं तरी काय?
lokmanas
लोकमानस: चौथ्या स्थानाचे दुखणे
What is Hindenburg Research allegation against SEBI
विश्लेषण: ‘हिंडेनबर्ग रिसर्च’चे सेबीच्या अध्यक्षांवर आरोप काय? या आरोपांमुळे खळबळ का उडाली?

 हरदीपसिंग निज्जर याच्या जूनमधील हत्येशी भारतीय हस्तकांचा संबंध असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्यानंतर राजनैतिक वाद उद्भवला होता. त्यातून, कॅनडाने त्याच्या राजदूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी, असे भारताने या आठवडय़ाच्या सुरुवातीला सांगितले होते. त्यानंतर कॅनडातील ‘सीटीव्ही न्यूज’ या खासगी दूरचित्रवाहिनीने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. भारताने ट्रुडो यांचे आरोप ‘हास्यास्पद’ व ‘प्रेरित’ असल्याचे सांगून फेटाळले होते.

हेही वाचा >>>लँडर, रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता मावळली; ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांचे मत

 कॅनडात भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या जितकी आहे, तितकीच कॅनडाने त्याच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या कमी करावी यासाठी भारत सरकारने कॅनडाला १० ऑक्टोबर ही मुदत दिली असल्याचे वृत्त सीटीव्ही न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिले.

 भारताच्या अटीनुसार कॅनडाच्या ४१ राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर जावे लागेल, असे पूर्वीच्या वृत्तात म्हटले होते, मात्र भारताने ही संख्या केवळ बरोबरीत आणण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी या वाहिनीला दिली. ‘भारतात नवी दिल्लीबाहेर काम करणाऱ्या बहुतांश कॅनडियन राजनैतिक कर्मचाऱ्यांना एक तर क्वालालंपूर किंवा सिंगापूरला हलवण्यात आले आहे,’ असे या वृत्तात म्हटले आहे.