बिहारमधील नितीश कुमार सरकारने गुरुवारी विधानसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. या विधेयकानुसार बिहारमध्ये मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी ६५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक पारीत करत असताना विधानसभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन मांझी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी नितीश कुमार यांनी जितन राम मांझी हे माझ्या मूर्खपणामुळे मुख्यमंत्री झाले, असं विधान केलं.

या प्रकारानंतर जितन राम मांझी यांनी विधानसभेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नितीश कुमार यांच्यावर टीकास्र सोडलं. यावेळी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी म्हणाले, “विधानसभेत मला उभं राहून बोलायचं होतं, पण मुख्यमंत्री (नितीश कुमार) उठले आणि काहीही बरळू लागले. मला आश्‍चर्य वाटलं की, ते हेच नितीश कुमार आहेत का? जे काही दिवसांपूर्वी होते. आज ते एका वेगळ्या रुपात पाहायला मिळाले. मला वाटतं की, त्यांच्यात काहीतरी मानसिक समस्या आहेत. ज्यामुळे ते असं बोलत होते. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय म्हणून ते तसं बोलले. त्यांनी जितन राम मांझी यांना कमी लेखले. त्यांना वाटलं असावं की मी भुईया-मुशर समाजाचा आहे, त्यामुळे ते जे सांगतील ते मी करेन.”

kalyan loksabha marathi news, 7 former corporators joined shivsena kalyan marathi news
कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का! अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह ७ माजी नगरसेवक शिवसेनेत
CM Eknath Shinde criticizes to Congress leader Rahul Gandhi
मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर खोचक टीका; म्हणाले, “आईच्या पदराला धरुन राजकारण…”
Chief Minister Eknath Shinde, Criticizes India Alliance, Leaderless and Agenda less india alliance, buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, eknath shinde shivena, election campaign, prataprao jadhav, marathi news, politics news,
“इंडिया आघाडीचा ना झेंडा, ना अजेंडा,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका; म्हणाले…
Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election 2024
विजय शिवतारे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना शब्द; म्हणाले, “बारामतीच्या विजयामध्ये पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल”

नितीश कुमार विधानसभेत नेमकं काय म्हणाले?

जितन राम मांझी यांच्यावर टीका करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, माझी चूक होती की मी अशा व्यक्तीला मुख्यमंत्री केलं. त्यांना मुख्यमंत्री केल्यानंतर दोनच महिन्यात माझ्या पक्षाचे लोक त्यांच्याबद्दल तक्रारी करू लागले. काहीतरी गडबड आहे, त्यांना पदावरून हटवा, अशी मागणी ते करू लागले. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. पण ते मी मुख्यमंत्री होतो, असं म्हणत फिरतात. पण माझ्या मूर्खपणामुळे ते मुख्यमंत्री झाले होते.