देशामधील करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. यापूर्वीही त्यांनी काही दिवसांपूर्वीच देशातील जनतेशी संवाद साधला होता. आज मोदी काय घोषणा करणार याकडे सर्व देशाचे लक्ष्य लागून राहिलेलं आहे. मोदी काय बोलणार यासंदर्भात अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच आता मोदी देशामध्ये आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची घोषणा करु शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

सर्वोच्च न्यायलयातील वकील आणि स्पंद या सेवाभावी संस्थेचे संस्थापक तसेच लेखक असणाऱ्या प्रशांत पटेल उमराव यांनी देशामध्ये आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उमराव यांनी यासंदर्भातील शक्यता वर्तवणारे ट्विट केलं असून त्यामध्ये त्यांनी कलम ३६० चा उल्लेख केला आहे. “नरेंद्र मोदी देशामध्ये कलम ३६० अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता आहे. देशाच्या आर्थिक स्थिरतेला किंवा भारताची राष्ट्रीय पत कमी होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपती कलम ३६० नुसार जर देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करु शकतात,” असं उमराव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
Congress News
कारवाईत दिरंगाई केल्यास न्यायालयाचा पर्याय? मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक
fact check around 12 years old video of nitin gadkari criticizing former pm manmohan singh govt falsely linked to lok sabha election 2024
“पंतप्रधानांचे वक्तव्य लोकशाहीविरोधी…”; नितीन गडकरींची पंतप्रधान मोदींवर टीका? व्हायरल VIDEO मागील सत्य काय? वाचा
narendra modi in uttar pradesh
राज्यघटना बदलण्याचा आरोप तथ्यहीन; काँग्रेसच्या आरोपांवर पंतप्रधान मोदी यांचे स्पष्टीकरण

आणीबाणी म्हणजे काय?

देशातील नागरिकांना मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत. मात्र काही विशिष्ट परिस्थितीत या मूलभूत अधिकारांवर अधिक कठोर मर्यादा आणल्या जातात. घटनात्मक तरतुदींचा वापर करून कायद्याचा वापर करून या मुलभूत अधिकारांवर काही ठराविक काळासाठी मर्यादा घातल्या जातात त्याला आणीबाणी असे म्हणतात. भारतीय राज्यघटनेत कलम ३५२ ते ३६० हे आणीबाणीशी संबंधित आहे. राज्य राज्यघटनेत ३ प्रकारच्या आणीबाणीचे उल्लेख आहे. पहिली राष्ट्रीय आणीबाणी दुसरी आर्थिक आणीबाणी आणि तिसरी राष्ट्रपती राजवट.