प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उपोषण केले होते. २१ दिवसांनंतर त्यांनी अखेर हे उपोषण मागे घेतले आहे. गेल्या २१ दिवसांपासून त्यांनी फक्त मीठ आणि पाण्यावर उपोषण केले होते. उपोषण मागे घेतलं असलं तरीही हा लढा सुरूच राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. २००९ साली आलेल्या थ्री इडियट्स चित्रपट याच सोनम वांगचूक यांच्या जीवनावर आधारित होता.

सोनम वांगचूक यांनी ६ मार्च रोजी या उपोषणाला सुरुवात केली होती. त्याचवेळी हे उपोषण २१ दिवस चालणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु, त्यानंतरही त्यांचा लढा सुरूच राहणार आहे. याबाबत त्यांनी एक्स पोस्टमध्य म्हटलंय की, मी उपोषण संपवले तेव्हा सात हजार लोक जमले होते. मी परत येईन. आज ७,००० लोक जमले. माझ्या उपोषणाचा पहिला टप्पा संपला. तसेच, २१ दिवस गांधीजींनी ठेवलेले सर्वात मोठे उपोषण होते.” पोस्टसोबत त्यांनी एक व्हीडिओ शेअर केला असून त्यात ते हिंदीत म्हणाले, “आज एक महत्त्वाचा दिवस आहे. पहिला टप्पा संपला आहे, पण उपोषण संपले नाही. उद्यापासून पुढील दहा दिवस महिलांचा समूह उपोषण करेल. त्यानंतर, तरुण मंडळी, मठातील भिक्षू मग पुन्हा मी अशा पद्धतीने उपोषणाची साखळी सुरू राहील. पण मला आशा आहे की साखळी उपोषण सुरू ठेवण्याची वेळ येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात लवकरच जबाबदार नेतृत्त्वाची भावना जागृत होईल.”

rahul gandhi jiu jitsu aikido
राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘जिउ-जित्सू’ आणि ‘आयकिडो’ यांचा केला होता सराव, ते काय आहे?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Vasai, child abuse, stepmother, Stepmother Brutally Assaults Children, Waliv Police Station,
वसई : सावत्र आईकडून दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ; गुप्तांगाला गरम चाकूने चटके, अमानुष मारहाण
Badlapur Crime News : School Male Cleaner Abuse Girls in Badlapur| Badlapur News Updates in Marathi After the incident in Badlapur the district collector ordered to check the Sakhi Savitri committees in schools
Badlapur School Case : बदलापूरातील घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना आली जाग; शाळांमध्ये सखी सावित्री समित्या आहे की नाही, हे तपासण्याचे आदेश
bangladesh mourning day
बांगलादेशात १५ ऑगस्ट राष्ट्रीय शोक दिवस म्हणून का पाळतात? अंतरिम सरकारने या दिवसाविरुद्ध घेतलेल्या नव्या निर्णयाने वाद का पेटलाय?
Sheikh Hasina demand to investigate the Bangladesh violence murders
हिंसाचार, हत्यांची चौकशी करा! शेख हसिना यांची मागणी, राजीनाम्यानंतर पहिलेच जाहीर वक्तव्य
orange growers in maharashtra concern over chaos in bangladesh
विश्लेषण: ठाणे खड्डे आणि कोंडीमुक्त कसे होईल? मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर परिस्थिती किती सुधारली?
Bhajan Kaur, Ankita Bhakat, Deepika Kumari, Olympic archery, determination, setbacks,
अचूक लक्ष्यवेध साधणाऱ्या ‘त्या तिघीं’च्या संघर्षाची कहाणी

सरकार जनतेचा आवाज ऐकेल

“मला आशा आहे की आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल. गेल्या काही आठवड्यांमध्ये ६० ते ७० हजार लोक इथे येऊन गेले. सरकार जनतेचा आवाज ऐकेल आणि दिलेली आश्वासने पूर्ण करेल”, ते पुढे म्हणाले.

याआधी मंगळवारी X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, सोनम वांगचूक यांनी एका गोठलेल्या पाण्याच्या ग्लासकडे लक्ष वेधले. ते म्हणाले तापमान -१० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असतानाही ३५० लोक उपोषणात सामील झाले होते. आम्ही आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या चेतना लडाखमधील हिमालयीन पर्वतरांगांच्या परिसंस्थेचे आणि स्थानिक आदिवासी संस्कृतींचे रक्षण करण्यासाठी जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

बौद्ध-बहुल लेह आणि मुस्लिमबहुल कारगिलच्या नेत्यांनी राज्याचा दर्जा आणि अधिकारांचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी लेह आणि कारगिल लोकशाही आघाडीच्या बॅनरखाली हातमिळवणी केल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला यूटीमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि उपोषण सुरू झाले. संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत बहुसंख्य आदिवासी लोकसंख्या.

मागण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली, परंतु आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या अनेक बैठकीनंतरही कोणताही तोडगा निघू शकला नाही. ४ मार्च रोजी केंद्रशासित प्रदेशातील नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांनी लोकांच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिल्याचे सांगितले. श्री वांगचुक यांनी दोन दिवसांनी लेहमध्ये उपोषण सुरू केले.