काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, हा दावा खोडून काढणारा एक फ्रेंच अहवाल समोर आल्याने नेताजींच्या मृत्यूबाबतचे गूढ आणखी वाढले आहे. या फ्रेंच अहवालानुसार नेताजींचा १८ ऑगस्ट १९४५ रोजी झालेल्या विमान अपघातात झालाच नव्हता. ते १९४७ पर्यंत जिवंत होते, या अहवालात म्हटले आहे. फ्रेंच सरकारच्या नॅशनल अर्काईव्हजमध्ये ११ डिसेंबर १९४७ रोजी हा अहवाल जमा करण्यात आला होता. पॅरिसस्थित इतिहासकर जे पी बी मोर यांनी या अहवालाच्या आधारे काही धक्कादायक दावे केले आहेत. त्यांच्या माहितीनुसार, तैवान येथे झालेल्या विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. याशिवाय, डिसेंबर १९४७ पर्यंत त्यांचा ठावठिकाणा माहिती नव्हता, असेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे तोपर्यंत नेताजी सुभाषचंद्र जिवंत होते, असे या अहवालातून प्रतित होते.

नेताजींच्या मृत्यूबाबत केंद्र सरकारने दिलेली माहिती धक्कादायक: ममता बॅनर्जी

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
gangster mukhtar ansari family
स्वातंत्र्यसैनिक ते कुख्यात गुंड; एका कुटुंबाचा सुरस व चमत्कारिक प्रवास
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

दरम्यान, भारत सरकारच्या दाव्यानुसार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १९४५ मध्ये विमान अपघातातच मृत्यू झाला होता. कोलकाताच्या एका व्यक्तीने माहिती अधिकारांतर्गत गृह मंत्रालयाला नेताजींच्या मृत्यूबाबत माहिती मागितली होती. विविध समितींच्या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला असल्याचे सरकारचे म्हणणे असल्याचे गृहमंत्रालयाने आपल्या उत्तरादाखल म्हटले होते. मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शाहनवाज समिती, न्या. जी. डी. खोसला आयोग आणि न्या. मुखर्जी चौकशी आयोगाच्या अहवालांचा सरकारने अभ्यास केला होता. त्याचबरोबर नेताजी हे ‘गुमनामी बाबा’या वेषात राहत होते, हा दावा सरकारने फेटाळला होता. मात्र, नेताजींचे पणतु आणि भाजप नेते चंद्र बोस यांनी यावर आक्षेप घेत सरकारने नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचे सत्य जाणून घेण्यासाठी विशेष तपास समिती गठीत करण्याची मागणी त्यांनी केली होती.

नेताजी फाइल्स : एका षड्यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा