कंबोडिया देशात भारतीयांकडून बळजबरीने साबयर गुन्हे करून घेतले जात असल्याच्या १३० तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. सरकारने भारतीय नागरिकांना सोडविण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यानंतर कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह शहरातील भारतीय दूतावासाने ७५ भारतीयांची सुटका केली आहे. दूतावासाचे द्वितीय सचिव अवरान अब्राहम यांनी ही माहिती दिली.

कंबोडियात जवळपास ५००० भारतीय नागरिकांकडून बळजबरीने सायबर गुन्हे करवून घेतले जात आहेत, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिली होती. सरकारच्या अंदाजानुसार, मागील सहा महिन्यात या सायबर गुन्हेगारीतून सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंबोडियामध्ये अडकलेले नागरिकांकडून भारतीय लोकांनाच लुटण्याचे काम केले जाते. शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करून लोकांकडून पैसे उकळण्याचे काम या लोकांकडून करून घेतले जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 75 indians rescued by embassy in cambodia says senior official kvg
First published on: 30-03-2024 at 09:54 IST