पीटीआय, फतेहगड साहिब/पटियाला

देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असेल, तर लोकांच्या जीवनात समृद्धी का नाही, असा सवाल करत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकावर जोरदार टीका केली.

Nitish Kumar
“नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची…”; नितीश कुमार चुकून काय म्हणाले?
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
chhagan bhujbal narendra modi
भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसला? भुजबळांची जाहीर कबुली; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…
abhijt panse mns candidate
भारतीय जनता पक्षाच्या जागेवर मनसेने केला उमेदवार जाहीर, आता भाजपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Cyclone Remal
पश्चिम बंगाल, बांगलादेश किनारपट्टीवर रेमल चक्रीवादळ दाखल

फतेहगढ साहिब मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अमरसिंग यांच्या प्रचारसभेत प्रियंका गांधी बोलत होत्या. पंतप्रधान मोदी हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी खोटे बोलत आहेत. त्यांनी जनतेला खोटी आश्वासने दिली आहे, असा हल्लाबोल करताना त्या म्हणाल्या की, देशात ७० कोटी तरुण बेरोजगार आहेत आणि बेरोजगारी ही ४५ वर्षांतील सर्वाधिक आहे. मोदी यांच्या केंद्रातील सरकारच्या काळात सरकारी क्षेत्रात ३० लाख पदे रिक्त आहेत. अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असल्याचे मोदी टप्प्याटप्प्याने मोठे दावे करतात. मला विचारायचे आहे की, अर्थव्यवस्था इतक्या वेगाने वाढत आहे आणि देशात प्रगती होत असेल तर जनतेची प्रगती का होत नाही, असा सवाल त्यांनी विचारला.