पंतप्रधान मोदी यांनी नियम बदलवून कोणताही अनुभव नसणाऱ्या अदाणी समुहाला देशातील सहा विमानतळांची मालकी दिली, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते तथा खासदर राहुल गांधी यांना केला आहे. संसदेत आज राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी हे आरोप केले. दरम्यान यावरून भाजपाने आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळ झाल्याचंही बघायला मिळालं.

हेही वाचा- अग्निवीर योजनेबाबत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “अजित डोभाल यांनी सैन्यावर…”

pm narendra modi speaks to putin on his ukraine visit also discusses measures to strengthen ties
युक्रेन भेटीवरून मोदी-पुतिन चर्चा; संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
national human rights commission orders police inquiry into detaining rti activist
माहिती अधिकार कार्यकर्त्याला केले नजरकैद; पोलिसांच्या चौकशीचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आदेश
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
Congress president Mallikarjun Kharge criticizes central government regarding MNREGA scheme
मनरेगा हे मोदींच्या ग्रामीण भारताच्या विश्वासघाताचे ‘जिवंत स्मारक’; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
sanjay shirsat replied to uddhav thackeray
Sanjay Shirsat : “…तर मुख्यमंत्रीही विकृत आहेत”, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसच्या मांडीवर बसून…”
Rahul Gandhi Sitting in Last Few Row
Rahul Gandhi: विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा अवमान? स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ऑलिम्पिक खेळाडूंच्या रांगेत बसवलं

काय म्हणाले राहुल गांधी?

“काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने भारतातील विमानतळाचा विकास करण्यासाठी खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. नियमाप्रमाणे कोणत्याही कंपनीला जर विमानतळ चालवण्याचा अनुभव नसेल तर त्याला विमानतळाची मालकी देता येत नाही, असतानाही अदाणी समुहाला देशातील सहा विमानतळांची मालकी देण्यात आहे. यामध्ये मुंबईसारख्या महत्त्वाच्या विमानतळाचाही समावेश होता. अदाणी समुहासाठी मोदी सरकारने नियम बदलले”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

हेही वाचा – “राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारी आणि महागाई हे…” लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

“मोदी सरकारने नियम बदलल्यानंतर भारतातील सर्वात महत्त्वाचे असलेले मुंबई विमानतळ जीव्हीके कंपनीकडून घेऊन अडाणींना दिले. यासाठी मोदी सरकारने ईडी, सीबीआय सारख्या तपास संस्थांचा वापर करत जीव्हीके कंपनीवर दबाव आणला”, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – अग्निवीर योजनेबाबत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “अजित डोभाल यांनी सैन्यावर…”

पुढे बोलताना, “अदाणींना सुरक्षा क्षेत्रातला काहीही अनुभव नव्हता. मात्र ते ड्रोन्स तयार करतात जे लष्कर, नौदल आणि हवाईदलासाठी वापरले जातात. एचएलच्या माध्यमातून हे काम अदाणींना दिलं गेलं. पंतप्रधान इस्रायलला जातात आणि त्यानंतर अदाणींना काम मिळालं. जे एअरपोर्ट्सच्या बाबत झालं तेच याबाबत झालं. कुठलाही अनुभव नसताना हे काम अदाणींना देण्यात आलं”, असेही ते म्हणाले.