बिहारच्या मुझ्झफरपूर येथून घरातून पळून गेलेल्या तीन मुलींचे मृतदेह मुथेरीतील बजना पूलाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आले आहेत. तीनही मुलींच्या पालकांनी या आपल्याच मुली असल्याची ओळखही पटवली आहे. गौरी कुमारी (१४), मोहिनी कुमारी (१४) आणि माया कुमारी (१३) या तीनही मुली इयत्ता नववीत शिकत होत्या. तिघींची घट्ट मैत्री होती. काही दिवसांपूर्वी या तिघींनी घरातून पळ काढला होता. आम्ही आध्यात्माच्या शोधात हिमालयात जात आहोत, अशी चिठ्ठी मुलींनी लिहून ठेवली होती.

गौरी कुमारीचे वडील अमित यांनी सांगितले की, १३ मे रोजी मुलींनी घर सोडले होते. यावेळी त्यांनी घरी सोडलेल्या चिठ्ठीत लिहिले, “बाबाने आम्हाला बोलावले आहे. त्यामुळे आम्ही आध्यात्माच्या शोधात हिमालयात निघालो आहोत. आता तीन महिन्यांनी १३ ऑगस्ट रोजी आम्ही घरी परतू.” आम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्महत्या करू, अशी धमकीही चिठ्ठीद्वारे मुलींनी दिली होती.

Journalist Woman Rape Case During Badlapur Incident Urgent hearing on Vaman Mhatre pre arrest bail
बदलापूर घटनेदरम्यान पत्रकार महिला विनयभंगाचे प्रकरण: शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंच्या अटकपूर्व जामिनावर तातडीने सुनावणी घ्या
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
kidnap, girl, kidnap attempt thane,
ठाण्यात अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
News About Akshay Shinde
Badlapur Crime : “अक्षय निर्दोष आहे, पोलिसांनी माझ्या मुलाला..”, बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा दावा
mp honour killing
Madhya Pradesh : धक्कादायक! परजातीतल्या मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून बापाने केली स्वत:च्या मुलीची हत्या
Ramgiri Maharaj, Prophet Muhammad,
Ramgiri Maharaj : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
Mercury transit of Kanya rashi create Bhadra Rajyoga
भद्र राजयोग देणार भरपूर पैसा; बुध ग्रहाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
three relatives in up gangrape woman
Ludhiana Woman Gangrape : संतापजनक! मुलीच्या प्रेमविवाहामुळे संतापलेल्या वडिलाने प्रियकराच्या बहिणीसोबत केलं दुष्कृत्य

गौरीच्या आईने सांगितले की, जेव्हा गौरी घराबाहेर पडली तेव्हा तिच्या हातावर मेहंदी नव्हती. मात्र तिचा मृतदेह पाहिला असता हातावर मेहंदी असल्याचे दिसले. तसेच मैत्रिणींनीही मेहंदी काढली असल्याचे दिसले. या तीनही मुलींचे फोनही गहाळ झालेले आहेत. बिहार पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा दाखविला असा आरोप गौरीच्या वडिलांनी केला आहे. १३ मे रोजी मुली बेपत्ता झाल्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली, पण पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नाही. जेव्हा वरिष्ठांनी सूचना दिल्या, तेव्हाच पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला.

मुझ्झफरपूरच्या शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख अशोक कुमार यांनी मात्र सदर आरोप फेटाळले. त्यांनी म्हटले की, तक्रार मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ त्याची दखल घेत गुन्हा दाखल केला होता. मुलींनी स्वेच्छेने घर सोडले होते, त्याचे कारणीही त्यांनी पत्रात नमूद केले होते. आम्ही मुलींचा शोध घेत होतो, जेव्हा त्यांचे मृतदेह आढळून आले, तेव्हा आम्ही कुटुंबियांना याची माहिती दिली.

दुसरीकडे मथुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलींचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठविले आहेत. तर मुझ्झफरपूर पोलिसांनीही या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.